इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२

 शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२


 


परळी वैजनाथ /प्रतिनिधी..........

       शहरातील मुख्य रस्त्यावर जणू अस्ताव्यस्त वाहतुकीला  कायदेशीर परवानगीच देउन टाकली आहे की काय अशी अवस्था सध्याआहे. ठिकठिकाणी फळांचे गाडे रस्त्यावर मनाला येईल त्या ठिकाणी कधीकधी तर रस्त्यावर मधोमध बिनदिक्कतपणे लावलेले असतात. वाहतूक कोंडी झाली तरी गाडा थोडा सुद्धा जागेवरून हलवण्याची तसदी ही घेतली जात नाही. उलट वाहनधारकांना या गाडेवाल्यांच्या रोषाला निमुटपणे सहन करण्याची वेळ कित्येकदा येते. सुरक्षीत वाहतूकीसंदर्भात कोणीच गंभीर नसल्याचे भयावह चित्र बघायला मिळत असते.. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा पी -१ पी-२ ची  पार्किंग व्यवस्था लावण्यात येणार आहे.

                  परळी शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले  असून, सुरक्षीत वाहतूकीसाठी  पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हातगाड्या व वाहनांचे रस्त्यांवर होणारे अडथळे दुर करण्यासाठी  उपाययोजना करण्याची गरज आहे.मोंढा,  एकमिनार चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, शिवाजी चौक, बसस्टॅण्ड आदी वर्दळीच्या ठिकाणीच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. सोमवारी बाजारच्या दिवशी तर जवळपास सर्वच मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम असते. बाजार समितीच्या गोलाईतून तर पादचाऱ्यांना ही कुठून जावे हा प्रश्न पडलेला असतो. 

                  

     पी -१ पी-२ .......

                    दरम्यान काही वर्षांपूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्याचा दृष्टीने चांगली व्यवस्था लावण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन दरदिवशी  पी -१ पी-२ ची शिस्त लावली होती. याची सुरुवातीला  अडचण वाटली होती पण नंतर या व्यवस्थेची सर्वांना सवय झाली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मोठी मदत झाली होती तसेच रस्ते मोकळे व सर्वांना उपयोग होत होता. परंतु ही व्यवस्था मोडकळीस आली. पुन्हा तेच वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर आले.शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी आता पुन्हा एकदा पी १ पी२ सुरू करण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!