इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

MB NEWS-शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२

 शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी परळीत पुन्हा एकदा सुरू होणार पी -१ पी-२


 


परळी वैजनाथ /प्रतिनिधी..........

       शहरातील मुख्य रस्त्यावर जणू अस्ताव्यस्त वाहतुकीला  कायदेशीर परवानगीच देउन टाकली आहे की काय अशी अवस्था सध्याआहे. ठिकठिकाणी फळांचे गाडे रस्त्यावर मनाला येईल त्या ठिकाणी कधीकधी तर रस्त्यावर मधोमध बिनदिक्कतपणे लावलेले असतात. वाहतूक कोंडी झाली तरी गाडा थोडा सुद्धा जागेवरून हलवण्याची तसदी ही घेतली जात नाही. उलट वाहनधारकांना या गाडेवाल्यांच्या रोषाला निमुटपणे सहन करण्याची वेळ कित्येकदा येते. सुरक्षीत वाहतूकीसंदर्भात कोणीच गंभीर नसल्याचे भयावह चित्र बघायला मिळत असते.. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा पी -१ पी-२ ची  पार्किंग व्यवस्था लावण्यात येणार आहे.

                  परळी शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न निर्माण झालेले  असून, सुरक्षीत वाहतूकीसाठी  पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हातगाड्या व वाहनांचे रस्त्यांवर होणारे अडथळे दुर करण्यासाठी  उपाययोजना करण्याची गरज आहे.मोंढा,  एकमिनार चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, शिवाजी चौक, बसस्टॅण्ड आदी वर्दळीच्या ठिकाणीच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. सोमवारी बाजारच्या दिवशी तर जवळपास सर्वच मुख्य रस्त्यावर ट्राफिक जाम असते. बाजार समितीच्या गोलाईतून तर पादचाऱ्यांना ही कुठून जावे हा प्रश्न पडलेला असतो. 

                  

     पी -१ पी-२ .......

                    दरम्यान काही वर्षांपूर्वी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्याचा दृष्टीने चांगली व्यवस्था लावण्यात आली होती. पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेऊन दरदिवशी  पी -१ पी-२ ची शिस्त लावली होती. याची सुरुवातीला  अडचण वाटली होती पण नंतर या व्यवस्थेची सर्वांना सवय झाली होती. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मोठी मदत झाली होती तसेच रस्ते मोकळे व सर्वांना उपयोग होत होता. परंतु ही व्यवस्था मोडकळीस आली. पुन्हा तेच वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर आले.शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल यासाठी उपाययोजना करण्यासाठी आता पुन्हा एकदा पी १ पी२ सुरू करण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....