मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

MB NEWS-वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे

 वैद्यनाथ मंदिर भाविकांसाठी उघडावे.- ॲड.दत्ता महाराज आंधळे 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - लाॕकडाऊनचे सारे नियम सहिष्णू आहेत म्हणून मंदिरांनी किती दिवस सहन करायचे.देव आणि भक्त यांच्यात कायमचा दुरावा निर्माण करायचा आणि लोकांची भावना देवधर्मावरची उडवायची हाच हेतू यातून प्रकर्षाने मंदिर बंद ठेवून प्रत्ययाला येतो आहे काय? असा सवाल ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी प्रशासनाला विचारला आहे .भाविक भक्तांना त्यांच्या उपास्य देवतेच्या आराधनेपासून कडक निर्बंध लादून अगोदरच वंचित ठेवलेले आहे.शंभर फुटावरुन बेल, फुल,गंध ,अक्षता याचेवर कडक नियमावली केली आहे .


भक्तांना दूर अंतरावरुन दर्शन घेण्याची सक्ती आहेच.परंतु देवधर्माची ओळख पण बुडली जावून नास्तिकवाद आपसूकच स्विकारला जाईल या उद्देशाने हे कुटील डाव टाकण्याचे पाप तर होत नाहीये ना.अशी शंका उपस्थित करून याचा निषेध कीर्तनकार तथा संतवाङमयाचे संशोधक आणि वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केला आहे. त्वरित वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी त्यांनी केली असून मंदिर बंद असल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर करत प्रभू वैद्यनाथ मंदिर उघडावे अशी मागणी दत्ता महाराज आंधळे यांनी केली आहे.

टिप्पण्या

  1. हॉटेल, डान्सबार सगळं चालू आहे.फक्त सप्ताह,मंदीर आणि गोरगरीब शेतकर्यांच्या लेकीबाळीचे लग्न बंद.हा कसला कारभार आहे?

    मित्रानो यावर मंथन होणे गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. बिअर बार सुरू आहेत मंदिर का बंद?
    नवीन राजकारण आहे
    यात्रा बंद आहे त सप्ताह बंद देवळात कुलूप लावून दारू चे आङ्ङे सुरू केले ?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट