इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार

 देहूतला बिजोत्सव होणारच, सरकार दहशत माजवतंय : बंडातात्या कराडकर



सरकारचा आदेश मोडणे हा फार मोठा गुन्हा नाही. जी शिक्षा आहे ती आम्ही भोगणार



सातारा : कोरोनाच्या बाबतीत सरकार दहशत तयार करुन फसवत असल्याचा आरोप वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. पुण्यातील देहू येथे होत असलेल्या तुकोबारायांचा बीजोत्सव आणि पैठणच्या यात्रेला सर्व वारकऱ्यांनी जमावे असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलंय.

   सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. तर पुण्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आता वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी उगारलेले हे हत्यार डोकेदुखी ठरणार आहे, असे दिसत आहे.

काय म्हणाले बंडातात्या कराडकर?

कोरोनाच प्रस्त वाढत नाही तर तसं भासवलं जातंय.

लोकसंखेच्या प्रणाणात पुण्यात कोरोनाचे प्रमाण खूप कमी आहे.


सर्दी पडसे झाले की कोरोनाचा रिपोर्ट येतो.


केवळ वारकरी संप्रदयाचे उत्सव आणि यात्रा ह्या आणि गेल्या वर्षभरात भरु दिल्या नाहीत.


देहूतील उत्सवाला दहा हजार वारकऱ्यांना परवानगी द्यावी.


पैठणच्या उत्सवा दिवशी शुक शुकाट असणे हे आमच्या बुध्दीला पटत नाही.


सरकारची चाकोरी तोडून आम्ही सर्व वारकरी जमणार आहोत.


कोरोनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवले जाताय, खोटे रिपोर्ट दिला जात आहे.


जेवढे कोरोनाचे पेंशंट होते त्यांना लुटले.


कोराना बाधित म्हणून बॉडी दिली जात नव्हती. त्या मृतदेहाचे सर्व अवयव गायब केले जात होते.


कोरोनाला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊन दहशत निर्माण केली.


धार्मिक स्थळे उघडली तर लोकांच्या मनातून घबराट, भिती जाईल.


आत्मविश्वास हा अध्यात्म आहे, अध्यात्माची शक्ती असल्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.


देहू आणि पैठणची यात्रा भरली पाहिजे, यासाठी आम्ही ठाम आहोत.


आमच्यावर जे गुन्हे दाखल करणार त्याला आम्ही सामोरे जाणार, आंदोलन करणारच.



सरकारशी आम्ही बोलणार नाही, परवानगी मागणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या