दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या---- शरद कावरे

 नाभिक समाजाला लाॅकडाऊन मध्ये शिथिलता द्या व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला शासकीय मदत द्या- शरद कावरे      


            

                   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय म्हणून विविध व्यवसाय सुरू ठेवून सलुन व्यवसाय मात्र लाॅकडाऊन च्या नावाखाली बंद केले आहेत त्यामुळे हातावर पोट असणारे  नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे तत्काळ सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी व उस्मानाबाद येथील मयत मनोज झेंडे यांला तत्काळ  शासकीय मदत द्यावी व त्या कुटुंब योग्य तो न्याय द्यावा आशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या परळी च्या वतीने निवेदना द्वारे मा.उपविभागीय अधिकारीसाहेब परळी वै. तसेच तहसीलदार साहेब परळी वै.व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्य़ाचे पालक मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे करण्यात आली आहे.

              लाॅकडाऊन च्या नावाखाली विविध व्यवसाय सुरू असताना नाभिक समाजाच्या सलुन व्यवसाय मात्र पुर्णपणे बंद करण्यात आला आहे .हे व्यवसाय बंद केल्याने नाभिक समाजावरील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीही 3 ते 4 महिने हा व्यवसाय बंद होता व पुन्हा हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याने नाभिक समाज आथिर्क दृष्टया अडचणीत आला आहे त्यामुळेच नाभिक समाजावर अत्यंमहात्या करण्याची वेळ आली आहे तरीही शासनाने इतर व्यवसाया प्रमाणे नियमाचे व निर्बंधाचे पालन करत सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी व मयत मनोज झेंडेला मदत करावी व तत्काळ सलुन व्यवसाय सुरू करावेत आशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळा चे मार्गदर्शक श्री शरद कावरे व शहर अध्यक्ष श्री प्रभाकरजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील निवेदन देण्यात आले यावेळेस हारीभाऊ घुले ,बंजरग चोपडे,महादेव वाघमारे ,राधाकृष्ण कांबळे,अनिल गवळी,कपिल मुळे ,मुळे,अंजय राऊत  इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....