युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव

 "आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव 



  परळी वैजनाथ :- राज्यात वेगाने वाढत चाललेल्या कोरोना संर्सगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरातील वार्डा-वार्डात "आमचा गाव-आमची जवाबदारी" व "आमचा वार्ड-आमची जवाबदारी"या अभियानांतर्गत गावातील/शहरातील जेष्ठ व तरूणांनी विचारविनिमय करून गाव व वार्ड पातळीवर कोरोना नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात व समिती मार्फत गावातील, वार्डातील वाढत चाललेल्या कोरोना संर्सगावर उपाययोजना करण्याची व जनजागृती करून कोरोना संसर्ग नियत्रंनात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                                   प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आसून संसर्ग अधिक झपाट्याने शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु त्यास जनतेकडून अपेक्षित आसे सहकार्य व प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही. त्यासाठी जनतेनेच मनावर घेऊन शासनाकडून मदतीची आपेक्षा न ठेवता गावपातळीवर व शहरात वार्ड पातळीवर सर्व सहमतिने एक कोरोना नियंत्रण समिती स्थापन करावी.व समिती मार्फत गावात/वार्डात जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवाव्यात.लोकांच्या मनात कोरोना बाबत आसलेली भीती व संभ्रम दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच शासन व प्रशासनांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परावृत्त करावे.समिती मध्ये वार्डाचे नगरसेवक, गावचे सरपंच, उपसंरपच ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील सामाजिक कार्याची आवड आसलेले तरुण,जेष्ठ मंडळी व महिलांचाही समावेश असावा.असे अघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या