इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव

 "आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव 



  परळी वैजनाथ :- राज्यात वेगाने वाढत चाललेल्या कोरोना संर्सगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरातील वार्डा-वार्डात "आमचा गाव-आमची जवाबदारी" व "आमचा वार्ड-आमची जवाबदारी"या अभियानांतर्गत गावातील/शहरातील जेष्ठ व तरूणांनी विचारविनिमय करून गाव व वार्ड पातळीवर कोरोना नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात व समिती मार्फत गावातील, वार्डातील वाढत चाललेल्या कोरोना संर्सगावर उपाययोजना करण्याची व जनजागृती करून कोरोना संसर्ग नियत्रंनात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                                   प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आसून संसर्ग अधिक झपाट्याने शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु त्यास जनतेकडून अपेक्षित आसे सहकार्य व प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही. त्यासाठी जनतेनेच मनावर घेऊन शासनाकडून मदतीची आपेक्षा न ठेवता गावपातळीवर व शहरात वार्ड पातळीवर सर्व सहमतिने एक कोरोना नियंत्रण समिती स्थापन करावी.व समिती मार्फत गावात/वार्डात जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवाव्यात.लोकांच्या मनात कोरोना बाबत आसलेली भीती व संभ्रम दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच शासन व प्रशासनांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परावृत्त करावे.समिती मध्ये वार्डाचे नगरसेवक, गावचे सरपंच, उपसंरपच ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील सामाजिक कार्याची आवड आसलेले तरुण,जेष्ठ मंडळी व महिलांचाही समावेश असावा.असे अघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....