परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव

 "आमचा गाव-आमचे शहर-आमची जवाबदारी अभियान: कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरात नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात - बंडू अघाव 



  परळी वैजनाथ :- राज्यात वेगाने वाढत चाललेल्या कोरोना संर्सगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावोगाव व शहरातील वार्डा-वार्डात "आमचा गाव-आमची जवाबदारी" व "आमचा वार्ड-आमची जवाबदारी"या अभियानांतर्गत गावातील/शहरातील जेष्ठ व तरूणांनी विचारविनिमय करून गाव व वार्ड पातळीवर कोरोना नियंत्रण दक्षता समित्या स्थापन कराव्यात व समिती मार्फत गावातील, वार्डातील वाढत चाललेल्या कोरोना संर्सगावर उपाययोजना करण्याची व जनजागृती करून कोरोना संसर्ग नियत्रंनात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.                                   प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आसून संसर्ग अधिक झपाट्याने शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. परंतु त्यास जनतेकडून अपेक्षित आसे सहकार्य व प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या सूचनांचे पालन होत नाही. त्यासाठी जनतेनेच मनावर घेऊन शासनाकडून मदतीची आपेक्षा न ठेवता गावपातळीवर व शहरात वार्ड पातळीवर सर्व सहमतिने एक कोरोना नियंत्रण समिती स्थापन करावी.व समिती मार्फत गावात/वार्डात जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवाव्यात.लोकांच्या मनात कोरोना बाबत आसलेली भीती व संभ्रम दुर करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच शासन व प्रशासनांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परावृत्त करावे.समिती मध्ये वार्डाचे नगरसेवक, गावचे सरपंच, उपसंरपच ,ग्रामपंचायत सदस्य व गावातील सामाजिक कार्याची आवड आसलेले तरुण,जेष्ठ मंडळी व महिलांचाही समावेश असावा.असे अघाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!