इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-दहावी बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर

 दहावी बारावी  परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके  तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत चालू असलेल्या पदवी परीक्षा व एप्रिल अखेर सुरू होणाऱ्या दहावी बारावी च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची दुकाने, तसेच जिल्हा व परळी शहरातील चालू असलेल्या विविध कार्यालय, बँक, शासकीय दवाखाना यांना लागणाऱ्या स्टेशनरी साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.


बीड जिल्ह्यात मंगळवार पासून अचानक लॉकडाऊन करून किराणा, दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली. परंतु सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत पदवी स्तरीय परीक्षा ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावी च्या लेखी परीक्षा एप्रिल अखेर चालू होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, परीक्षा पॅड, पेन व इतर शैक्षणीक साहित्य लॉकडाऊन मुळे पुस्तके व स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. पेन पॅड नसेल तर परीक्षा तरी कशी द्यायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

तसेच शहरातील चालू असलेल्या शासकीय तसेच काही खाजगी कार्यलय, विविध बँक, शासकीय व खाजगी दवाखाने यासाठी लागणारे दैनंदिन स्टेशनरी साहित्य स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. दहावी बारावी वगळता इतर विद्यार्थ्यांचे शाळेतून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासा साठी लागणारी पुस्तके, वह्या, पेन व इतर आवश्यक साहित्य न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

पुस्तके व स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकाने कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध पाळून उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या