दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*

 *सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "सेवाधर्म" हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले.

       राष्ट्रवादी वकील संघ व सेवाधर्म टीमच्या वतीने परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले. यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पी एम सातभाई यांच्या हस्ते "जलनेती पात्र" वकील बांधवाना भेट देण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास अॅड. डी पी कडभाने,अॅड.डी एल उजगरे,राष्ट्रवादी वकील संघाचे शहर अध्यक्ष adv मनजीत सुगरे,अॅड. गिराम ,अॅड.बाळासाहेब मुंडे, अॅड. दस्तगिर,अॅड. एजाज , अॅड. उरुज आदी वकील बांधव उपस्थित होते.

                "जल' म्हणजे "पाणी" आणि "नेती" म्हणजे 'स्वच्छता".प्राचीन काळापासून योगसाधना करण्यापूर्वी जलनेती करण्याची शास्त्रोक्त पद्धती आहे.आजच्या काळात या पद्धतीचा अवलंब केल्याने अनेकांना याचे फायदे झालेले आपण सर्वांनी प्रसारमाध्यमातून बघितले आहे.कोरोनाचा विषाणू श्वसन मार्गाने प्रवेश करतो आणि सर्वप्रथम आपला संचय हा नाकपुड्या मागील खाचात करतो. आयटीपीसीआर चाचणी मध्ये याच खाचेतून सॅम्पल घेतले जाते.आपल्याला या जलनेतीद्वारा नाकपुड्याद्वारे याच खाचा स्वच्छ ठेवता येतात,कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही केवळ यासाठी स्वच्छ पाणी घेतले पाहिजे. सर्वांना उपयुक्त ठरणारे जलनेती पात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वितरीत करण्यात येत आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरीकांना होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....