इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*

 *सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "सेवाधर्म" हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले.

       राष्ट्रवादी वकील संघ व सेवाधर्म टीमच्या वतीने परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले. यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पी एम सातभाई यांच्या हस्ते "जलनेती पात्र" वकील बांधवाना भेट देण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास अॅड. डी पी कडभाने,अॅड.डी एल उजगरे,राष्ट्रवादी वकील संघाचे शहर अध्यक्ष adv मनजीत सुगरे,अॅड. गिराम ,अॅड.बाळासाहेब मुंडे, अॅड. दस्तगिर,अॅड. एजाज , अॅड. उरुज आदी वकील बांधव उपस्थित होते.

                "जल' म्हणजे "पाणी" आणि "नेती" म्हणजे 'स्वच्छता".प्राचीन काळापासून योगसाधना करण्यापूर्वी जलनेती करण्याची शास्त्रोक्त पद्धती आहे.आजच्या काळात या पद्धतीचा अवलंब केल्याने अनेकांना याचे फायदे झालेले आपण सर्वांनी प्रसारमाध्यमातून बघितले आहे.कोरोनाचा विषाणू श्वसन मार्गाने प्रवेश करतो आणि सर्वप्रथम आपला संचय हा नाकपुड्या मागील खाचात करतो. आयटीपीसीआर चाचणी मध्ये याच खाचेतून सॅम्पल घेतले जाते.आपल्याला या जलनेतीद्वारा नाकपुड्याद्वारे याच खाचा स्वच्छ ठेवता येतात,कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही केवळ यासाठी स्वच्छ पाणी घेतले पाहिजे. सर्वांना उपयुक्त ठरणारे जलनेती पात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वितरीत करण्यात येत आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरीकांना होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या