इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *परळीत उघडकीस आला असा श्रीमंत भिकारी.......!* _पिशवी चोरीची भिक्षुकाची पोलीसात तक्रार;तीन तासात तपास_(video news)

 *परळीत उघडकीस आला असा श्रीमंत भिकारी.......!*



_पिशवी चोरीची भिक्षुकाची पोलीसात तक्रार;तीन तासात तपास_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी

        भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो. पण या भिकारी माणसाकडे काय असणार असे म्हणुन दुर्लक्ष केले जाते मात्र परळीत पिशवी चोरीच्या घटनेत तपासातुन खरोखरच श्रीमंत भिकारी उघडकीस आला आहे.वैद्यनाथ मंदिर समोर बसणार्या एका भिक्षुकाकडे तब्बल पावणेदोन लाख रुपये जमापुंजी असल्याचे दिसून आले.पोलीसांनी तीन तासात या पिशवी चोरीच्या घटनेचा तपास लावला आहे.

        रात्रंदिवस मेहनत केली तरी एवढी कमाई करू शकत नाहीत एवढी रक्कम एखाद्या भिक्षुकाकडे सापडली तर कोणालाही आश्चर्य वाटु शकते.भिकारी श्रीमंत असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतात, एवढं बोलून आपण भिकारी ते भिकारीचं असं करून दुर्लक्ष करतो, पण या भिकारीच्या संपत्ती पुढे आपण भिकारी असल्याचं आपल्याला दिसून येईल. मुंबईतले  भिकारी आपल्या संपत्तीबद्दल  चर्चेत असतात. पण परळीतील भिकारी ही काही कमी नाहीत हे एका घटनेने आज पुढे आले आहे. 



        बाबूराव नाईकवाडे नावाची वयोवृद्ध व्यक्ती  वैद्यनाथ मंदिर समोर गेल्या अनेक वर्षांपासून बसून भीक मागते. या व्यक्ती ने पोलीस ठाण्यात येऊन आपली पिशवी हरवली असुन त्यात पावणेदोन लाख रुपये असल्याची तक्रार केली.अगोदर कोणाचाच विश्वास बसला नाही.परंतु नाईकवाडे यांनी आयुष्य भर जमा केलेली रक्कम हरवली असल्याची गयावया व रडारड केली.त्याची तगमग बघुन पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला.तीन तासात पोलीस तपासात ही हरवलेली पिशवी मिळवण्यात पोलीसांना यश आले. 



        पिशवी तपासणी केली असता 1 लाख 72 हजार 290 एवढी मोठी रक्कम त्या पिशवीत खरोखरच आढळून आली.पोलीसांनी नाईकवाडे यांना पंचासमक्ष ही रक्कम सुपुर्द केली.ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे, डि.बी पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ (तात्या) आदींनी केली.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या