इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.* *आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*

 *मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.*



*आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*


परळी वै.ता.२३ प्रतिनिधी



महाराष्ट्र शासन व मानवलोकच्या सहकार्यातुन मोहा येथे काॅ .गंगाधरअप्पा बुरांडे स्मतृी प्रतीष्ठाणच्या पढुाकाराने ५० खाटांच्या कोविड विलगीकरण केंद्राची सुरवात झाली आहे. जिल्हयातील डोंगरी व ग्रामीण भागातील मोहा पहिलेच केंद्र असणार आहे.

परळी तालुक्यातील मोहा हे गाव डोंगरी भागातील गाव आहे. दहा किमी परिसरातील गावे ही डोंगरी भागातील आहेत. त्या सर्व गावांना मोहा सोयीचे व जवळचे गाव वाटते. मोहा परीसरातील गावांमध्ये कोरोना महामारीने कहर केला आहे. मागच्या काही दिवसात ग्रामीण भागात कोरोणा रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आजच्या घडीला परिसरात तब्बल

६६ रुग्ण सक्रीय (अक्टीव्ह) आहेत. ग्रामीण भागात या आजारा विषयी भिती निर्माण झालेली असल्याने अनेकजण आजार अंगावर काढीत आहेत. त्यामुळे संसर्ग मोठया प्रमाणात होत आहे. परिणामी ग्रामीण भागात रूग्न वेळेवर उपचार घेत नसल्याने मृत्युचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थीतीत सतत लोककल्याणाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या मानवलोक व कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणच्या भौतीक सोयी सुविधेच्या मदतीतुन मोहा येथील

महाराष्ट्र विद्यालयात ५० खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले

आहे. या केंद्रात मोहा परीसरातील गहृ विलगीकरणाची सोय नसणाऱ्या व सौम्य लक्षणेअसणाऱ्या कोरोना

रुग्णावर २४तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहे. तरी परीसरातील संशयित

रुग्णांनी भीती न बाळगता तपासणी करून घ्यावी. आवश्यकता असल्यास योग्य उपचार करून घ्यावेत असे आव्हान काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणचे कॉ. अजय बुरांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या