दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.* *आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*

 *मोहा येथे कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण व मानवलोकच्या वतीने ५० खाटाच्या कोवीड विलगीकरण केंद्र सुरू.*



*आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर व कर्मचारीच्या निगराणीखाली २४ तास सेवा*


परळी वै.ता.२३ प्रतिनिधी



महाराष्ट्र शासन व मानवलोकच्या सहकार्यातुन मोहा येथे काॅ .गंगाधरअप्पा बुरांडे स्मतृी प्रतीष्ठाणच्या पढुाकाराने ५० खाटांच्या कोविड विलगीकरण केंद्राची सुरवात झाली आहे. जिल्हयातील डोंगरी व ग्रामीण भागातील मोहा पहिलेच केंद्र असणार आहे.

परळी तालुक्यातील मोहा हे गाव डोंगरी भागातील गाव आहे. दहा किमी परिसरातील गावे ही डोंगरी भागातील आहेत. त्या सर्व गावांना मोहा सोयीचे व जवळचे गाव वाटते. मोहा परीसरातील गावांमध्ये कोरोना महामारीने कहर केला आहे. मागच्या काही दिवसात ग्रामीण भागात कोरोणा रूग्नाची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. आजच्या घडीला परिसरात तब्बल

६६ रुग्ण सक्रीय (अक्टीव्ह) आहेत. ग्रामीण भागात या आजारा विषयी भिती निर्माण झालेली असल्याने अनेकजण आजार अंगावर काढीत आहेत. त्यामुळे संसर्ग मोठया प्रमाणात होत आहे. परिणामी ग्रामीण भागात रूग्न वेळेवर उपचार घेत नसल्याने मृत्युचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थीतीत सतत लोककल्याणाच्या कामात पुढाकार घेणाऱ्या मानवलोक व कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणच्या भौतीक सोयी सुविधेच्या मदतीतुन मोहा येथील

महाराष्ट्र विद्यालयात ५० खाटांचे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले

आहे. या केंद्रात मोहा परीसरातील गहृ विलगीकरणाची सोय नसणाऱ्या व सौम्य लक्षणेअसणाऱ्या कोरोना

रुग्णावर २४तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येणार आहे. तरी परीसरातील संशयित

रुग्णांनी भीती न बाळगता तपासणी करून घ्यावी. आवश्यकता असल्यास योग्य उपचार करून घ्यावेत असे आव्हान काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणचे कॉ. अजय बुरांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....