इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- • *सेवाधर्म :महिला व लहान मुलांमुलींंच्या विलगीकरण केंद्रातुन कोरोनामुक्त रुग्ण निश्चिंत होऊन जातात घरी* ⬛ *_धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे रुग्णांकडून आभार_* ⬛

 • *सेवाधर्म :महिला व लहान मुलांमुलींंच्या  विलगीकरण केंद्रातुन कोरोनामुक्त  रुग्ण निश्चिंत होऊन जातात घरी*



⬛  *_धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे रुग्णांकडून आभार_* ⬛

परळी । प्रतिनिधी

     ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महिला व लहान मुलांमुलींंच्या  आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर मधील रुग्ण योग्य उपचार व मुदतीनंतर  कोरोनामुक्त रुग्ण निश्चिंत होऊन घरी जात आहेत. याठिकाणी मिळालेल्या सेवा-सुविधा, सकारात्मक वातावरण व नियमित तपासणी यामुळे रुग्णांना समाधान मिळत आहे.बरे होउन जाणारे रुग्ण धनुभाऊ व त्यांचे सहकारी तसेच डाॅक्टर, आरोग्य सेवा देणारांचे  आभार मानत आहेत.



          राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून  कोरोना बाधित महिला व लहान मुले यांच्या साठी  १०० बेडचे मोफत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रात भरती झालेल्या रूग्णांची अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे संपूर्ण काळजी घेतली जाते. रूग्णांची तज्ज्ञ डाॅक्टर्स कडून  तपासणी, औषधोपचार, पौष्टिक आहार,   योगा, प्राणायाम हे नित्य नेमाने घेतले जाते. बारीक सारीक सोयी, सुविधेवर पदाधिकारी लक्ष देतात.  सेंटरमधील सकारात्मक वातावरणामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच माजी नगरसेवक रवि मुळे हे पूर्णवेळ लक्ष देत आहेत.नुकतेच सहा रुग्ण बरे झाल्यानंतर  कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले. सेंटरमधून परततांना डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, डॉ.आनंद टिंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदींनी  रूग्णांचे अभिनंदन करून त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच काळजी घेण्यासही सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या