इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन

 शालेय क्रमिक पुस्तकांचा नियोजनबध्द विनियोग करून शासनाच्या शेकडो कोटी रुपयांची बचत करा 



चंदुलाल बियाणी यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व विविध खात्याच्या मंत्र्यांना निवेदन

 

परळी l प्रतिनिधी

     इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची सर्व विषयांची व सर्व माध्यमांची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येतात. मागील शैक्षणीक वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. इयत्ता १ ते ४ थी च्या शाळा उघडल्याच नाहीत तर इतर इयत्तांचे वर्ग काही दिवसच भरले त्यातच अभ्यासक्रमही कपात केला गेला. आँनलाईन शिक्षणामुळे पाठ्यपुस्तके फारशी वापरली गेली नाहीत. बंद मुळे शाळांना सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देणे शक्य झाले नाहीं त्यामुळे गतवर्षी छापण्यात आलेली पुस्तके तशीच पडून आहेत. या पुस्तकांचा विनियोग करण्यात यावा जेणेकरून दरवर्षी मराठी, इंग्रजी, उर्दूसह अनेक भाषांची पुस्तके छापण्यास येणारा शेकडो कोटी रुपयांची बचत होऊ शकते अशा आशयाचे निवेदन बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे, शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहेत.

चंदुलाल यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा सर्व माध्यमांची क्रमिक पुस्तके नव्याने छापण्यासाठी राज्य सरकारला शेकडो कोटी रूपये खर्च करावे लागतात. मागील वर्षीची पुस्तके शिल्लक असतांना नव्याने पुस्तके न छापता त्याच पुस्तकांचा विनियोग केला पाहीजे. त्याचबरोबर मागील वर्षात ज्यांना पुस्तके देण्यात आलेली आहेत, त्यांना सुचना देवून ती परत मागवून  घ्यावी व शाळांकडे पडून असलेली पुस्तके चालू वर्षातील विद्यार्थ्यांना द्यावीत, यामुळे शासनाचे शेकडो कोटी रूपये बचत होऊ शकतात. त्यामुळे उपरोक्त विषयाकडे आपण लक्ष देवून हा विषय मार्गी लावावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे, शिक्षण संचालक यांच्याकडे करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!