दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-परळी शहरातील लसीकरणाचा सावळा गोंधळ थांबवा-श्रीनिवास देशमुख* ----------------

 *परळी शहरातील लसीकरणाचा सावळा गोंधळ थांबवा-श्रीनिवास देशमुख*

----------------



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-

आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे परळीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा बोजवारा उडाला असून या प्रकरणी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून लसीकरणाचे काम सुरळीत करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व इतर संबंधितांना दिलेल्या निवेदनात श्री देशमुख यांनी ही मागणी केली आहे. परळी शहरात गेल्या कांही दिवसापासून लसीकरणाबाबत कोणतीही सुसूत्रता नाही. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या बेफिकीरी कारभारामुळे लसीकरणाचे नियोजन नाही. दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरात केवळ तीन लसीकरण केंद्र आहेत. तेही नियमित चालू नाहीत. लसीकरणाबाबत नागरिकांना कोणतीच माहिती दिली जात नाही. केंव्हा, कोणाचे आणि कुठे लसीकरण होणार हे कळविले जात नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसांड सध्या सुरू आहे. शहरात प्रभाग निहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत ही मागणी नागरिकांकडून होवूनही याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही. यामुळे आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

शनिवारी शहरातील नटराज रंग मंदिर येथे 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार होते. परंतु केंद्रावर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लसीकरण न करताच परत पाठवले गेले. विविध कारणे यावेळी संबंधितांनी सांगितली. यामुळे उन्हातान्हात आलेल्या व केंद्रावर रांगेत तासनतास थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या संपूर्ण प्रकारास आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप श्री देशमुख यांनी केला आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांची नोंद होत नाही, त्यांना पुढच्या लसीकरणाबाबत कोणतेही संदेश येत नाहीत. त्यामुळे आणखीन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रावर एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहात नाहीत.

या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालावे व शहरातील लसीकरण सुरळीत करावे अशी मागणी श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....