इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-*लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*

 *लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा - अॅड.अरुण पाठक*




परळी वैजनाथ (प्रतिनिधी-)

          परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून लसीकरणाचा दुसरा टप्पा १मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी सुरु झाला आहे.शहरात लसीकरणाला वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी भाजयुमो प्रदेश चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे .

      परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढवत आहोत याचेही भान नागरिक नाईलाजाने ठेवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील गणेशपार भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराज चौक परिसरात आणखी एक लसीकरण केंद्र वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून विद्यानगर प्रियानगर जलालपुर व अन्य परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

           एकापेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण सुविधा असेल तर आरोग्य यंत्रणेवरही अधिकचा ताण पडणार नाही. तसेच नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाचा प्रसारही होणार नाही. शहरात शिवाजी महाराज चौक परिसरात केंद्र सुरू करुन आवश्यक असलेली यंत्रणा तातडीने कार्यान्वित करुन नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजयुमो चिटणीस अॅड.अरुण पाठक यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....