इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं !

 पुरोहिताला थोबाडीत मारणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं !




त्रिपुरा | त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.धार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं.ब्राह्मणाला मारणं जिल्हाधिकारी यांना महागात पडलं असुन या जिल्हाधिकाऱ्याला सध्या पदावरुन हटवलं गेलं आहे.गैरवर्तन करणारे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांचं निलंबन करून त्यांना पदावरुन हटवण्यात आलंय.


     पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावलं होतं. तसेचधार्मिक विधी करणार्या पुरोहिताला थोबाडीत मारलं होतं. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली.

शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

  1. जिल्हाधिकाऱ्यांना कोणालाही मारण्याचा अधिकार नसतो..,....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अजिबात नाही,स्वता भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्याने एखाद्या निरपराध लोकांना मारने चुकीचे आहे

      हटवा
    2. नसतोच
      मारणे तर दुर, हुसकावून बोलण्याचा सुद्धा अधिकार नसतो. या साठी पोलीस प्रशासन प्रशस्त आहे.

      हटवा
  2. जिल्हाधिकारी असले म्हणजे समाजाशी गैर वर्तन करू नये

    उत्तर द्याहटवा
  3. जास्त शिकुन मोठ्या हुदयावर गेलेल्या बड्या अधिकार्याने बेअक्कल आसल्यासारखे वागु नये, त्यांना शोभत नाही

    उत्तर द्याहटवा
  4. हा हिंदू पुजारी आहे म्हणून मारलं ! एखाद्या इमामाला , बिशप पाद्र्याला हा हात तरी लावू शकेल का ? लावला तर किती ठिकाणी काय काय होईल ?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या