इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !* *पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव*

 *गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरमधील रूग्णांना मिळतोय गोपीनाथ गडावरील आंब्यांचा गोडवा !*



*पंकजाताई मुंडे घेत असलेल्या काळजीबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यांवर कृतज्ञतेचे भाव* 


परळी । दिनांक २०। 

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत सुरू असलेल्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरमधील रूग्णांना दररोजच्या जेवणात गोपीनाथ गडावरील मधुर आणि रसाळ आंब्यांची चव चाखायला मिळत आहे. पंकजाताई मुंडे यांच्या आग्रही सूचनेनुसार प्रतिष्ठानच्या टीमने अक्षय्य तृतीयेपासून रूग्णांच्या दैनंदिन आहारात याचा समावेश केल्याने जेवणाची लज्जत आणखी वाढल्याचे समाधान रूग्णांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.


  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना आंबा, चिंच, बोरं, जांब अशी विविध प्रकारची फळं खूप आवडायची. या सर्व फळांची झाडे पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लावलेली आहेत. सध्या मोसम असल्याने मोठया प्रमाणावर आंबे आले आहेत. सदर आंबे लोकनेत्याचा 'प्रसाद' म्हणून आयसोलेशन सेंटर मधील रूग्णांना द्यावीत अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केली होती, त्यानुसार त्यांनी गडावरील आंबे सेंटरमध्ये पोहोचवली. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णांना अक्षय्य तृतीयेपासून त्यांच्या दररोजच्या जेवणात ही मधुर व रसाळ आंबे दिली जात आहेत. या आंब्याने रूग्णांच्या जेवणाची लज्जत अधिकच वाढली आहे. सेंटरमधील रूग्णांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देण्याबरोबरच त्यांच्या आहाराचीही देखील तितकीच काळजी घेणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल रूग्णांच्या चेहर्‍यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव दिसून आले.


*शंभराहून अधिक कुटुंबांना घरपोच भोजन* 

----------------------------

मोफत भोजन व्यवस्थेतंर्गत शहरातील शंभर हून अधिक कोरोना बाधित कुटुंबांना प्रतिष्ठान मार्फत सध्या दोन वेळा घरपोंच भोजन देण्यात येत आहे. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दररोज त्यासाठी मेहनत घेत आहेत. आयसोलेशन सेंटरमध्ये आतापर्यंत ११४ रूग्णांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी ६५ रूग्ण कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या