मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

 कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय





मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा......


१५ मेपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढणार आहे की आहे त्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलथा मिळणार आहे? याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे. 


कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या घटत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन वाढणार की, नियमांमधिये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 


'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही दुसरीकडे चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. 


तीन वेळा वाढवले निर्बंध 


महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने ५ एप्रिलला कठोर नियम लागू केले. पुन्हा १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने हे निर्बंध १५ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्यण घेतला. आता १५ मेनंतर राज्य सरकार काय निर्यण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....