परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

 कोरोना : १५ मेनंतर लाॅकडाऊन वाढणार का? आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय





मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा......


१५ मेपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढणार आहे की आहे त्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलथा मिळणार आहे? याबाबत नागरिक संभ्रमात आहेत. आज होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पंरतु, समाधानाची बाब ही आहे की, राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे वाढत्या आकडेवारीत घसरण झाली आहे. 


कोरोनाची रुग्णांची वाढती संख्या घटत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्यांही वाढलेली आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाऊन वाढणार की, नियमांमधिये शिथिलता देण्यात येणार, यासंबंधिच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 


'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही जिल्ह्यांत कोरोना अजूनही वाढत असल्याचेही दुसरीकडे चित्र आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाॅकडाऊन पुन्हा वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात जात आहे. 


तीन वेळा वाढवले निर्बंध 


महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने ५ एप्रिलला कठोर नियम लागू केले. पुन्हा १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने हे निर्बंध १५ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्यण घेतला. आता १५ मेनंतर राज्य सरकार काय निर्यण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!