इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS- *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*

 *गाढे पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी*



परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)

          तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती कोरोना विषयक उत्साहात साजरी करण्यात आली.

             गाढे पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतचे उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, रामेश्वर घेवारे व बन्सी सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुरुलिंग महाराज फुटके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जिवन कार्याचा आढावा मांडताना सांगितले की, १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. जातीय व्यवस्था निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न केले. तर माजी सरपंच कांतराव सोनवणे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती सर्वांसमोर मांडताना सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज अल्पायुषी ठरले पण त्यांना जेवढे जीवन मिळाले त्यात त्यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी प्राणांची बाजी लावून कार्य केले. ते धर्म रक्षक होते. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य जयवंत कराड, पत्रकार प्रविण फुटके, गणेश फुटके, लक्ष्मण अवधूत, नितीन घेवारे, धोंडीराम जगताप आदि उपस्थित होते. यावेळी कोविड विषयक शासनाच्या नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट