इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*

 *विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..,  

         करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १५ जुनपासुन बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना केवळ आणि केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली, याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ‘आशां’नी करोना गाव मुक्तीसाठी काम करावे, असे आवाहन केले आहे.‘आशां’ना किमान १३ हजार रुपये मानधन द्यावे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य आशा— गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’ ने केली आहे..१५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला.‘आशां’ना प्रतिदिन ३०० रुपये शहरी भागात, तर ग्रामीण भागात हजार रुपये महिना याचा अर्थ ३५ रुपये रोज या दराने काम करण्यास भाग पाडले जाते . त्यांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नियमित दिल्या गेल्या नाहीत, असे आशा संघटनांचे म्हणणे आहे.

      या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.या निवेदनावर सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा आरसुळ,मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे,रेखा वाघमारे,सुरेखा भिसे,सुलताना तांबोळी,खाजाजी शेख,सुषमा साखरे,मंगल गित्ते,संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदुबाई कुकर, सुमित्रा पवार,हेमा काळे,अनिता गिराम आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या