दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*

 *विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचा १५ जुनपासुन बेमुदत संप;बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..,  

         करोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १५ जुनपासुन बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना केवळ आणि केवळ आशांनी केलेल्या कामामुळे यशस्वी होऊ शकली, याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे. आता करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ‘आशां’नी करोना गाव मुक्तीसाठी काम करावे, असे आवाहन केले आहे.‘आशां’ना किमान १३ हजार रुपये मानधन द्यावे, तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा आणि विमा संरक्षण द्यावे अशी मागणी ‘महाराष्ट्र राज्य आशा— गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’ ने केली आहे..१५ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला.‘आशां’ना प्रतिदिन ३०० रुपये शहरी भागात, तर ग्रामीण भागात हजार रुपये महिना याचा अर्थ ३५ रुपये रोज या दराने काम करण्यास भाग पाडले जाते . त्यांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नियमित दिल्या गेल्या नाहीत, असे आशा संघटनांचे म्हणणे आहे.

      या संपात बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन होणार सहभागी होणार असुन या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनियन च्या वतीने करण्यात आले आहे.या निवेदनावर सिटु चे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.जी.खाडे, बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियन चे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष किरण सावजी, सुवर्णा आरसुळ,मायादेवी बनसोडे, प्रियंका घागरमाळे,रेखा वाघमारे,सुरेखा भिसे,सुलताना तांबोळी,खाजाजी शेख,सुषमा साखरे,मंगल गित्ते,संगीता मुंडे, सुनिता पवार, इंदुबाई कुकर, सुमित्रा पवार,हेमा काळे,अनिता गिराम आदींची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....