MB NEWS-पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

------------------------------------------ 



मुंबई : पंढपूरची आषाढी यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वारकरी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पायी वारी नेण्यावरुन मतभेद आहेत. राज्य सरकारने मानाच्या दहा पालख्यांना एसटीबसने जाण्याची परवानगी दिली आहे. तर काही वारकरी अजूनही पायी पालखी नेण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर पायी वारीच्या परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव तर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 


सुप्रीम कोर्टाचे वकील ॲड. श्रेयश गच्चे आणि ॲड. राज पाटील कोर्टात बाजू मांडणार आहेत. किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात येणार आहे. सरकार जे काही निर्देश देईल त्या सगळ्याचं पालन करायला वारकरी तयार आहेत. वारकरी हा शिस्तबद्धच असतो तो कधी धुडगुस घालत नाही. निवडणुकीसारखे अनेक राजकीय कार्यक्रम होतात मग वारीला अटकाव का? असा प्रश्ना आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी उपस्थित केला आहे. अडीचशे नोंदणीकृत पालख्या असताना केवळ मानाच्या दहा पालख्या का निवडल्या. सर्वांच्या प्रतिनिधित्वाचा विचार का केला नाही. पहिली मागणी आमची पायी वारीला परवानगीची आहे, ती मान्य झाली नाही तर किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी ही विनंती कोर्टाकडे करू, असे ते म्हणाले. पुढच्या दोन-तीन दिवसात ही याचिका सुनावणीस येईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.


*⭕यंदाही पालख्या बसमधूनच..*


पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे.


मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तप पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. 


संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !