इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-आशा स्वयंसेविकांचा संप मिटला मानधनवाढ आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय

 आशा स्वयंसेविकांचा संप मिटला 



मानधनवाढ आणि कोविड भत्ता देण्याचा निर्णय

मुंबई l

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी पुन्हा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशा स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधनवाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.


आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या बेमुदत संप प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक मंगळवारी बोलावली होती.


मात्र; चर्चेवेळी कोणताही तोडगा निघाला नव्हता. मात्र, आज बुधवारच्या बैठकीत तोड़गा निघाला. बुधवारी संपाचा ९ वा दिवस होता.


१५ जूनपासून महाराष्ट्रात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे संपावर गेले होते. मानधन नको, वेतन द्या, या मूळ व प्रमुख मागणीसह कोरोना काळात प्रतिदिन ५०० रुपये भत्ता देण्याबरोबरच आशा स्वयंसेविका (वर्कर) यांचा शासनाने विमा काढण्याबरोबरच आरोग्य सेवा- सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करत राज्यातील सुमारे ७२ हजारांहून अधिक आशा व गटप्रवर्तकांनी घरात राहूनच राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला होता.


कोरोना महामारीच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आशा वर्कर्स ग्रामीण भागात कोरोना योद्धा म्हणून कार्य करत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना योग्य ते उपचार मिळाले. जिल्हा आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरलेली असताना आशा वर्कर यांनी मोलाचे कार्य केले. आजही ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची भिस्त सर्व आशा वर्कर्स यांच्यावरच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या