इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून केवळ ४५० बॅगा !

 यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन  पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून  केवळ ४५० बॅगा !



परळी  वैजनाथ, प्रतिनिधी....

      परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी घरचेच सोयाबीन  पेरावं लागणार अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण महाबीजने लाॅटरी पद्धतीने केवळ ४५० बॅगा च परळीला उपलब्ध झाल्या आहेत.राज्यात  महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परळीतही तीच अवस्था निर्माण झाली आहे.शेतकर्यांना अधिकाधिक बियाणे उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.

      

    महाराष्ट्रात मान्सून पाऊस वेळेअगोदर दाखल झाला आहे. राज्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र, राज्यात काही ठिकाणी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. सतत दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये समाधान कारक पावसाने हजेरी लावली आहे.कापसाप्रमाणं सोयाबीनचं पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. मात्र, महाबीजकडे सोयाबीनच्या बियाणांची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

     सोयाबीन बियाणे साठी 25 मे पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार होती. यानंतर लॉटरी पद्धतीने सोयाबीनचं बियाणं वाटप करण्यात आले. परळीत मात्र महाबीजच्या केवळ 450 बॅग उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच बियाणं वापरावं, असं आवाहन कृषी विभागाचे कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....