MB NEWS-यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून केवळ ४५० बॅगा !
यंदा शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन पेरावं लागणार : परळीसाठी महाबीजकडून केवळ ४५० बॅगा !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी घरचेच सोयाबीन पेरावं लागणार अशी अवस्था निर्माण झाली आहे. कारण महाबीजने लाॅटरी पद्धतीने केवळ ४५० बॅगा च परळीला उपलब्ध झाल्या आहेत.राज्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. परळीतही तीच अवस्था निर्माण झाली आहे.शेतकर्यांना अधिकाधिक बियाणे उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात मान्सून पाऊस वेळेअगोदर दाखल झाला आहे. राज्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरु आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. मात्र, राज्यात काही ठिकाणी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. सतत दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मध्ये समाधान कारक पावसाने हजेरी लावली आहे.कापसाप्रमाणं सोयाबीनचं पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. मात्र, महाबीजकडे सोयाबीनच्या बियाणांची कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
सोयाबीन बियाणे साठी 25 मे पर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार होती. यानंतर लॉटरी पद्धतीने सोयाबीनचं बियाणं वाटप करण्यात आले. परळीत मात्र महाबीजच्या केवळ 450 बॅग उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच बियाणं वापरावं, असं आवाहन कृषी विभागाचे कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा