प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS- *✍️HSC result 2021: बारावीचा निकाल वेळेत लागणार; बोर्डाची ग्वाही* ------------------------------------------

 *✍️HSC result 2021: बारावीचा निकाल वेळेत लागणार; बोर्डाची ग्वाही*

------------------------------------------ 



बारावी निकाल ३१ जुलैच्या आत लावावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाचा गोंधळ, मुंबईत दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस पाहता निकाल वेळेत लागणार नाही, अशी चर्चा रंगली होती. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत बारावी निकालाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असून, निकाल वेळेत जाहीर होईल असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.


शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना २१ जुलैपर्यंत मंडळाच्या कम्प्युटर प्रणालीमध्ये विषयनिहाय गुण भरण्याची मुदत दिली होती. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार दिवसांचा अवधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर ही मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली. शिक्षण विभागाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्गशिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस, तर वर्गशिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. मात्र संकेतस्थळाच्या अडचणीमुळे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचे समोर आले. बुधवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शिक्षक गुण अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करू शकले नव्हते. त्यातच गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी व विशेषतः कोकण पट्ट्यात, मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून शिक्षकांना आपापल्या शाळा-कॉलेजांत पोहोचणे शक्य झालेले नाही. पुढील चार दिवस असाच पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या