इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

 अॅक्शन मोड: पंकजा मुंडे परळीत; घडामोडींना वेग

वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

परळी वैजनाथ  : प्रतिनिधी

     भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील व मराठवाड्यात बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को.आॅप.बॅकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा दिला आहे.या बॅंकेच्या येत्या काही महिन्यांत निवडणुका आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देण्यात आल्याने अनेक राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. येणार्या निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडे चेअरमनपदी कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

         संपूर्ण राज्यात शाखा असलेल्या वैद्यनाथ अर्बन को आॅप.  बँकेचे अध्यक्ष अशोक जैन  यांनी गुरुवारी (दि.२९) सायंकाळी झालेल्या बोर्ड कमिटीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली व १००० कोटींच्या ठेवी असलेल्या वैद्यनाथ  बँकेचे गेल्या १० वर्षांपासून अशोक जैन हे अध्यक्ष राहिलेले आहेत. दिला. १३ जुलै २०११ ला अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर २५० कोटींच्या ठेवीवरुन १००० कोटींच्या ठेवी, मराठवाड्यानंतर  संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या शाखा स्थापन करुन विस्तार केला. अशोक जैन यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागले. पण या सर्व आरोपांना अशोक जैन यांनी बँकेच्या प्रगतीतून या आरोपांना उत्तर दिले आहे. पण गुरुवारी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कारण देत अशोक जैन यांनी राजीनामा दिला. आता या बँकेचे अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे कोणाची नेमणूक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  येत्या काही महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका होणार आहेत.यादृष्टीने नवीन चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार याला विशेष महत्त्व आहे.

टिप्पण्या

  1. बदल अपेक्षितच आहे कारण पुढील काळामध्ये नवीन नेतृत्वाला किंवा हुशार अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या