प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड व पालम तालुका अध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समितीचे ओळख पत्र

 पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड व पालम तालुका अध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समितीचे ओळख पत्र 



पालम /प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज दि -०१/०७/२०२१ वार गुरुवार रोजी ..पालम येथे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीचे ओळख पत्र गंगाखेड व पालम तालुकाध्यक्ष यांना देण्यात आले. यावेळी लष्कर वार्ता चे संपादक शेषेराव सोपने, संपादक सम्यक वर्तमानकाळ तथा पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा सरचिटणीस विनोद कांबळे, शहराध्यक्ष अवधूत जाधव कार्यकारिणी सदस्य शशिकांत पौळ, पत्रकार शिवाजी शिंदे , पत्रकार चांद तांबोळी, पत्रकार कळंबे, यांच्या उपस्थितीत दोन तालुकाध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र समितीचे ओळख पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संपादक विनोद कांबळे यांनी पत्रकार व त्यांची सुरक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले व तालुक्यातील सर्व पत्रकारांना आव्हान केले की सर्वांनी एकसंघ एक संघटक म्हणून कार्य करा व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा , त्यानंतर संपादक सोपणे यांनी ही पत्रकारांचे हक्क अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच नवनियुक्त अध्यक्ष यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहु अशी ग्वाही दिली. त्यानंतर सर्व उपस्थित पत्रकरांने आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त अध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे तर आभार प्रसाद पोळ यांनी मानले.

महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हलल्याचे प्रमाण वाढत आहे तर गाव पातळीवर ही हे प्रमाण वाढत आहे यावर चिंता व्यक्त केली व आपण पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मा.यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदेव प्रयत्न करनार असेही यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या