इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार* *_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_*

 *जिरेवाडी या गावाला सतत चौथ्यांदा एलआयसी तर्फे विमा ग्राम पुरस्कार*



*_जिरेवाडी गावचा आदर्श घेत इतर ग्रामपंचायतीने विमा ग्राम पुरस्कार मिळवावा - शाखाधिकारी सुधीर कांत_*




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी तालुक्यातील जिरेवाडी या गावाला एलायसीचा बिमाग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले.जिरेवाडी परिसरात असलेल्या अयोध्या नगर मध्ये असलेल्या श्री राम मंदिर येथे बीमाग्राम पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


भारतीय जीवन बीमा निगम शाखा अंबाजोगाई यांच्या कडुन हा पुरस्कार जिरेवाडी गावाला वितरित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कांत शाखाधिकारी परळी प्रमोद भालेराव विकास अधिकारी परळी, बालासाहेब मुंडे मुख्य विमा सल्लागार तसेच विमा प्रतिनिधी दिगंबर मुंडे श्रीहरी गुट्टे या सर्वांच्या उपस्थिती मध्ये एक लाख रुपये चेक देण्यात आला.


पुढील वर्षीही आम्ही हा पुरस्कार निश्चित मिळवू असा विश्वास सरपंच गोवर्धन मुंडे यांनी व्यक्त केला. जिरेवाडी या गावाचा आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतीने देखील विमा ग्राम पुरस्कार मिळवावा असे उद्गार सुधीर कांत यांनी काढले

या कार्यक्रमाला उपसरपंच शिवाजी मुंडे ग्राम पंचायत सदस्य निवृती मुंडे,नरेश मुंडे ,अंगद कांदे,माजी सैनिक महादेव फड,ग्रामसेवक गोरे, ज्ञानोबा मुंडे सर,मारोती ढाकणे, रंगनाथ मुंडे, सुधाकर गिते, प्रकाश चव्हाण यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या