प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

 *विविध मागण्या संदर्भात लाल बावटा चे तहसीलसमोर सोमवारी निदर्शने*

परळी वै : दि 17 प्रतिनिधी

 महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) संघटनेच्यावतीने विविध मागण्या संदर्भात सोमवार दि 19 रोजी परळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

भूमिहीन शेतमजुरांना गेल्या कोविड १९ च्या  टाळेबंदी पासून अद्याप पर्यंत शेतमजुरांना रेशन मिळाले नाही.पेन्शन धारकांना जी पेन्शन मिळते त्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाही अनेकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही यात शासनाने अनेक जाचक अटी लावून सर्व गरिबांना शेतमजुरांना योजना मिळण्यापासून दूर ठेवण्याचे काम सरकारने व्यवस्थितपणे चालविले जात आहे .तेव्हा या विरुद्ध खालील मागण्यासाठी दि १९जुलै २०२१ रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनकर्त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

1) विभक्त झालेल्या कुटुबांना तत्काळ रेशन वाटप करा.

२) परळी तालुक्यातील प्रत्येक गावातील " ड " यादीमध्ये असलेल्या कुटुबांना तत्काळ घरकुल वाटप करा.

३) " ड " यादीमध्ये ज्या कुटुंबाचे नाव नाही त्या लोकांचा योग्य सर्वे करून त्यांचा घरकुलाच्या यादीत समावेश करून त्यांना घरे द्या.

4) श्रावणबाळ, सं.गा यो वृद्धापकाळ इत्यादी नि.यो.या योजनेचा लाभार्थ्यांना २१००० हजारच्या उत्पन्नाची जाचक अट रद्द करा व अनुदान चालू करा.

5) रोजगार हमीचे जॉबकार्ड विभक्त कुटुंबांना वाटप करा.

६) बेघर भूमिहीन शेतमजूर गायरानात घरे बांधून आहेत त्या जागा त्यांच्या नावे करून त्यांना तत्काळ PTR द्या.

7) जनजागृती करून लसीकरणाचा वेग वाढवा.

8) श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना या निराधार पेन्शन धारकांना 3000 रुपये मासिक मानधन देण्यात यावे.

 सोमवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लाल बावटा संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष कॉ.सुदाम शिंदे,परळी तालुका अध्यक्ष कॉ.सखाराम शिंदे,धम्मानंद वाव्ह्ळे कॉ.पंडित शिंदे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या