प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य;विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन*

 *आषाढी वारीवर निर्बंध निषेधार्य; विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळीत निवेदन* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.सरकारच्या या जुलमी निर्णयाच्या विरोधात विश्व हिंदू परिषदने परळीत आज दि.१६ जुलै रोजी निषेध आंदोलन केले. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.  

     शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.अगदी निजाम राजवटीतही वारी सुरुच होती.वारीला कोणतीही आडकाठी नव्हती.सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत.हा निर्णय चुकीचा आहे.सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती.वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी.गरज असेल तर केंद्रीय पोलिस बल मागवावे.दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी.मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करत वारीला  परवानगी मागितली होती.पण सरकार तयार झाले नाही.

      सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने  निवेदन देताना  प्रखंड अध्यक्ष सौ.वर्षा ताई अनिल जोशी,जिल्हा पालक मंत्री श्रीपाद कुलकर्णी, प्रखंड उपाध्यक्ष अरुणा ताई परळीकर, जगदीश पाठक, प्रखंड मंत्री शैलेश पांडे,अनंता महाराज जोशी वडगाव, लोखंडे वडगाव, कल्पनाताई चाटूरीकर देशपांडे आदींसह     पदाधिकारी उपस्थिती होती.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या