इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पीकपाणी वार्तापत्र/महादेव शिंदे: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

 पीकपाणी वार्तापत्र: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

परळी वैजनाथ/महादेव शिंदे........... 

      तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कापूस, सोयाबीन पिकासह इतर पीके सुकण्यास सुरुवात झाली असून एकदोन दिवसात पाऊस नाही पडला तर पिकांची वाढ खुंटणार असून पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून यातील लागवडी योग्य क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर आहे. खरीपाची पेरणी साधारणपणे ५८ हजार हेक्टर ते ६० हजार हेक्टर झाली आहे. यामध्ये अंदाजे ८ हजार ४०० हेक्टर वर ऊसाची लागवड आहे. तर यंदा सोयाबीन पीकास जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली असून गेल्यावर्षी सोयाबीन २६ हजार हेक्टरवर पेरण्यात आले होते तर यंदा ३२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण कापूस पीकासाठी लागवड, खत घालणे, तण काढणे, कापूस वेचणी यासाठी मजूरांची संख्या जास्त लागते यासाठी खर्चही मोठा होतो. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा यंदा सोयाबीन पीकाकडे वाढला आहे. गेल्यावर्षी कापूस पीकाची लागवड १९ हजार हेक्टर झाली होती. ती यावर्षी फक्त ९ ते १० हजार हेक्टरच झाली आहे. तूर या पीकाची पेरणी साधारणपणे ५ हजार हेक्टर करण्यात आली आहे.

 गेल्या वर्षी तूर ४ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. दरम्यान यंदा जुन महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली असून काही ठिकाणी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खूंटण्याची शक्यता असून येत्या दोन चार दिवसांत पाऊस नाही पडला तर पिके वाळून जाण्याची शक्यता आहे. तर मुगाला सध्या शेंगा लगडल्या आहेत मात्र भरण्याच्या वेळी पावसाने ओढ दिली आहे. तालुक्यात दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आभाळ भरुन येत आहे. पण पाऊस काही पडत नाही. शेतकऱ्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उघडीप दिल्याने काही शेतकरी अंतर्गत मशागतीची कामे करत आहेत. ज्यांच्या कडे पाण्याची व्यवस्था आहे. ते शेतकरी ड्रीपच्या साह्याने पाणी देत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या