परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-पीकपाणी वार्तापत्र/महादेव शिंदे: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

 पीकपाणी वार्तापत्र: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

परळी वैजनाथ/महादेव शिंदे........... 

      तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कापूस, सोयाबीन पिकासह इतर पीके सुकण्यास सुरुवात झाली असून एकदोन दिवसात पाऊस नाही पडला तर पिकांची वाढ खुंटणार असून पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून यातील लागवडी योग्य क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर आहे. खरीपाची पेरणी साधारणपणे ५८ हजार हेक्टर ते ६० हजार हेक्टर झाली आहे. यामध्ये अंदाजे ८ हजार ४०० हेक्टर वर ऊसाची लागवड आहे. तर यंदा सोयाबीन पीकास जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली असून गेल्यावर्षी सोयाबीन २६ हजार हेक्टरवर पेरण्यात आले होते तर यंदा ३२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण कापूस पीकासाठी लागवड, खत घालणे, तण काढणे, कापूस वेचणी यासाठी मजूरांची संख्या जास्त लागते यासाठी खर्चही मोठा होतो. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा यंदा सोयाबीन पीकाकडे वाढला आहे. गेल्यावर्षी कापूस पीकाची लागवड १९ हजार हेक्टर झाली होती. ती यावर्षी फक्त ९ ते १० हजार हेक्टरच झाली आहे. तूर या पीकाची पेरणी साधारणपणे ५ हजार हेक्टर करण्यात आली आहे.

 गेल्या वर्षी तूर ४ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. दरम्यान यंदा जुन महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली असून काही ठिकाणी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खूंटण्याची शक्यता असून येत्या दोन चार दिवसांत पाऊस नाही पडला तर पिके वाळून जाण्याची शक्यता आहे. तर मुगाला सध्या शेंगा लगडल्या आहेत मात्र भरण्याच्या वेळी पावसाने ओढ दिली आहे. तालुक्यात दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आभाळ भरुन येत आहे. पण पाऊस काही पडत नाही. शेतकऱ्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उघडीप दिल्याने काही शेतकरी अंतर्गत मशागतीची कामे करत आहेत. ज्यांच्या कडे पाण्याची व्यवस्था आहे. ते शेतकरी ड्रीपच्या साह्याने पाणी देत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!