दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार

 पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात



 प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते 



अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार 

परळी ( प्रतिनिधी) परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.पाउस नसल्याने खरिपातील सोयाबीन,मुंग,बाजरी, कापूस, ज्वारी, आदि पिके करपून जात आहेत.आज परळी तालुक्यातील बेलंबा,कौठळी, मलकापूर आदि गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

       .परिस्थिती फार बिकट आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे हिरावून गेला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा नेते राजेश गिते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार परळी वैजनाथ यांच्या कडे केली आहे.

विविध गावचे सरपंच व शेतकरी यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरित करावेत, कृषी विभागाला व विमा कंपनी एजंट यांना पाहणी करण्यासाठी आदेश द्यावेत, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.प्रशासनाने लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई करावी .

        अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.

या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मिरवट सरपंच धुराजी साबळे,मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, मारोतराव आंधळे,दशरथ गिते, प्रदिप गिते, भास्कर गिते, बळीराम गिते,दत्तु गिते, बालाजी गुट्टे, अरविंद गुट्टे,शिवाजी डापकर,शिराम डापकर, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....