इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार

 पावसाची उघडीप,खरिप पिके धोक्यात



 प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी-राजेश गिते 



अन्यथा मा पंकजाताई मुंडे व खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार 

परळी ( प्रतिनिधी) परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.पाउस नसल्याने खरिपातील सोयाबीन,मुंग,बाजरी, कापूस, ज्वारी, आदि पिके करपून जात आहेत.आज परळी तालुक्यातील बेलंबा,कौठळी, मलकापूर आदि गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.

       .परिस्थिती फार बिकट आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे हिरावून गेला आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भाजपा नेते राजेश गिते यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार परळी वैजनाथ यांच्या कडे केली आहे.

विविध गावचे सरपंच व शेतकरी यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरित करावेत, कृषी विभागाला व विमा कंपनी एजंट यांना पाहणी करण्यासाठी आदेश द्यावेत, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.प्रशासनाने लवकरात लवकर या निवेदनावर कारवाई करावी .

        अन्यथा आमच्या नेत्या भाजपा राष्ट्रीय सचिव मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला आहे.

या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मिरवट सरपंच धुराजी साबळे,मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, मारोतराव आंधळे,दशरथ गिते, प्रदिप गिते, भास्कर गिते, बळीराम गिते,दत्तु गिते, बालाजी गुट्टे, अरविंद गुट्टे,शिवाजी डापकर,शिराम डापकर, आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या