दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन

 खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन



परळी वै. ता. १६ प्रतिनिधी*

२०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळउन देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे ना. मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

    

     अखील भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी चे निवेदन दिले. निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारमध्ये आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरूण विमा मंजुर करूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा,पिक विमा योजना कंपनी धार्जीनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिसष्टमंडळाने ना. मुंडे यांच्याकडे केली. यावेळी ना. मुंडे यांनी विमा कंपनी व राज्याचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक घेउन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करतो असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब, जिल्हाध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, कॉ. संदिपान तेलगड, कॉ. सुभाष डाके, कॉ. माउली सुरवसे, कॉ. प्रकाश चव्हाण उपस्थीत होते अशी माहीती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कॉ. अजय बुरांडे यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....