इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन

 खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी किसान सभेचे धनंजय मुंडे यांना निवेदन



परळी वै. ता. १६ प्रतिनिधी*

२०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळउन देण्यासाठी सरकारकडे आग्रह करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले. पिक विम्याच्या बाबतीत कृषीमंत्री व विमा कंपनीशी चर्चा करणार असल्याचे ना. मुंडे यांनी शिष्टमंडळाला सांगीतले असल्याची माहीती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

    

     अखील भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी (ता.१६) परळी येथील चेमरी रेस्ट हाउस येथे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी चे निवेदन दिले. निवेदनात खरिप २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकारमध्ये आग्रही भुमिका घ्यावी. विमा कंपनीस महसुल विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरूण विमा मंजुर करूण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन पिक विमा मिळावा,पिक विमा योजना कंपनी धार्जीनी न रहाता शेतकऱ्यांच्या हिताची रहावी अशी आग्रही मागणी किसान सभेच्या शिसष्टमंडळाने ना. मुंडे यांच्याकडे केली. यावेळी ना. मुंडे यांनी विमा कंपनी व राज्याचे कृषी मंत्री यांच्या सोबत बैठक घेउन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करतो असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. मोहन लांब, जिल्हाध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. दत्ता डाके, कॉ. संदिपान तेलगड, कॉ. सुभाष डाके, कॉ. माउली सुरवसे, कॉ. प्रकाश चव्हाण उपस्थीत होते अशी माहीती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कॉ. अजय बुरांडे यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!