दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे ! किसान सभेचे कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना निवेदन

 

बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे !



किसान सभेचे  कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना निवेदन

परळी वै.प्रतिनिधी...


      बीड जिल्हयातील २०२० चा पिक विमा देण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीचे निवेदन मुंबई येथील मंत्रालयात सोमवारी (ता.२) राज्याचे कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांना दिले असल्याची माहीती किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.



     बीड जिल्हयातील लाखो शेतकऱ्यांनी २०२० चा पिक विमा अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीकडे आठशे कोटी रूपये विम्याच्या हप्त़्यापोटी रक्कम भरले हेते. केवळ 19 हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रूपयाचा विमा कंपनीने मंजुर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा वाटप केला आहे.त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार पाठविली नाही या सबबीखाली विमा मंजुर केला नाही. बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळालेले आहे. शासनाचा नुकसानीचा अहवाल असतानाही विमा कंपनी विमा नाकारत आहे. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान करणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा २०२० चा पिक विमा मंजुर करण्यास विमा कंपनीस भाग पाडावे या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयात सोमवारी (ता.२) कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अजय बुरांडे यांनी भेट घेउन निवेदन दिले आहे. निवेदनात शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मिळाल्यास कोरोना काळात हजारो शेतकरी विमा कंपनीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील असा ईशारा देण्यात आला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांनी शेतकऱ्याच्या बाजुने सहानुभुती पुर्वक विचार करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी डिवायएफआय चे कॉ. मोहन जाधव उपस्थीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....