दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* *वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*

 *मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* 



*वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*


परळी ।दिनांक १५ ।  

मी आणि ऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत वैद्यनाथ साखर कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन याहीवर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार असल्याचा शब्द कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज दिला. 



       भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शेतकरी, सभासदांसमोर त्या बोलत होत्या. मागील काही काळात नैसर्गिक आणि आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता मात्र आपण अडचणीवर मात करून कारखाना यशस्वीपणे चालवला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार असुन जोपर्यंत मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथ कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस फक्त वैद्यनाथ कारखान्याला गाळपास द्यावा आणि कर्मचारी यांनीही सहकार्य करावे असे आवाहन केले. 

 ••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....