इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* *वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*

 *मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथला कोणतीही अडचण येऊ देणार नाही - पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास* 



*वैद्यनाथ कारखाना येथे उत्साहात ध्वजारोहण*


परळी ।दिनांक १५ ।  

मी आणि ऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत वैद्यनाथ साखर कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन याहीवर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार असल्याचा शब्द कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज दिला. 



       भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर शेतकरी, सभासदांसमोर त्या बोलत होत्या. मागील काही काळात नैसर्गिक आणि आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना अडचणीत आला होता मात्र आपण अडचणीवर मात करून कारखाना यशस्वीपणे चालवला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार असुन जोपर्यंत मी आणि ऊस आहे तोपर्यंत वैद्यनाथ कारखान्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस फक्त वैद्यनाथ कारखान्याला गाळपास द्यावा आणि कर्मचारी यांनीही सहकार्य करावे असे आवाहन केले. 

 ••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या