इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम

 परळीत काॕग्रेसला गतवैभव मिळवून देऊ - सय्यद हानिफ सय्यद करिम


परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळी शहर काॕग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नुकतीच सय्यद हानिफ सय्यद करिम उर्फ बाहदुर भाई यांची निवड झाली आहे.बहादुर भाई यांनी शहराध्यक्ष पदाची जवाबदारी स्विकारताच शहर काॕग्रेस कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.बैठक संपन्न होताच पञकार परिषद घेऊन पञकारांशी बहादुर भाई यांनी संवाद साधला.यावेळी काॕग्रेसचे जेष्ठनेते बाबुराव मुंडे,वसंत मुंडे ,प्रकाश देशमुख,अवस्थी,अॕड संजय रोडे अदी नेतेगन उपस्थित होते.


पञकारांशी संवाद साधतांना बहादुर भाई यांनी सांगितले कि,राज्यात आघाडी सरकार मध्ये असलो तरी राज्यात पुढे होऊ घातलेल्या निवडणुका काॕग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच जाहिर केल्याने परळी नगर परिषदेच्या निवडणुका कुढल्याही पक्षाची आघाडी न करता स्वबळावर लढवुन परळी नगर परिषदेवर काॕग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचे सांगितले.शहराच्या विविध नागरी प्रश्नावर लवकरच पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.काॕग्रेस पक्षच भाजपाला सत्तेपासुन दुर करु शकतो.पुन्हा एकदा काॕग्रेस परळी शहरात जोमाने जनतेचे कामे करुन गतवैभव आणल्या शिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला.


प्रत्येक वार्डात नव्याने शाखा,पदाधिकारी आणी कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.लोकशाहीवादी पक्ष म्हणून काॕग्रेसकड पाहिले जाते.दिन दुबळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे ही बहादुरभाई यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष बहादुरभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरिकांनी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला.


दरम्यान सकाळी काॕग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची शहराच्या विविध प्रश्नावर पुढे काय करायचे या विषयावर व्यापक बैठक संपन्न झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!