प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-*कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता* 🕳️ *ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी*

 कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहूतीने सांगता

🕳️ ज्योतिर्लिंगक्षेत्रात शतचंडी यागाचा लाभ ही मोठी उपलब्धी- जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी


परळीवैजनाथ, प्रतिनिधी....

       धर्मशास्त्रात शतचंडी यागाला विशेष महत्त्वआहे. कार्तिक माहात्म्य मोठ्या प्रमाणावर असून या पर्वणीत विविध धार्मिक विधी व साधनांना अतिशय महत्त्व आहे. या अनुषंगाने ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन ही मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन संकेश्वर मठाचे जगद्गुरु शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी केले.परळीत कार्तिक मासानिमित्त आयोजित नवकुंडी शतचंडी यागाची संत महंतांच्या उपस्थितीत पुर्णाहुतीने सांगता झाली याप्रसंगी आशिर्वचनपर मनोगतात ते बोलत होते.    

      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत परळी वैजनाथ येथे पवित्र कार्तिक मासानिमित्त नवकुंडी शतचंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक पर्वणीचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घेतला. वैद्यनाथ मंदिरच्या बाजूला वक्रेश्वर मंदिर येथे १६ नोव्हेंबर रोजी या  सोहळ्याची पुर्णाहुती झाली. जगद्गुरू शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज संकेश्वर मठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत नव कुंडी याग हवन, शत चंडी हवन करण्यात आले.यावेळी सर्वाना स्वामीजीनी आशिर्वाद दिले.

      कार्यक्रमा ची सांगता महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली.या वेळी स्वामींच्या पादुका व यथोचित सत्कार  पंडित नितीन राजुरकर यांनी केला.कार्यक्रमाचे यजमान पद श्री.व सौ.प्रदीप प्रदीप देशमुख, श्री.व सौ.रघुवीर मालक देशमुख ,श्री.व सौ.शरदराव मोहरीर, श्री.व सौ.तेजस सेठ सोमाणी, श्री.व सौ.सतीशराव मुंडे,  श्री.व सौ.रणजित भोईटे,श्री.व सौ. बाबुराव गडगुळ ,श्री.व सौ.हरिभाऊ  धर्माधिकारी, श्री.व सौ.गणेश टिंबे, श्री.व सौ. ओमप्रकाश बियाणी,  श्री.व सौ.गोविंद सेठ बंग,श्री.व सौ.सूर्यकांत कातकडे ,श्री व सौ. रमेशराव धर्माधिकारी,  श्री.व. सौ.अँड. गिरीश राजुरकर, यांनी भूषवले.

             पाच दिवस संपन्न झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले.यामध्ये प.पु.यज्ञेशवर सेलुकर महाराज, पशुपतीनाथ चे प.पु. डॉ. अलोकनाथ महाराज,भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, जेष्ठ नेत्या सुदामतीताई गुट्टे,  सिक्कीम चे. श्री. व सौ. बी.के.राय, माजी नगराध्यक्ष श्री.बाजीराव  धर्माधिकारी, डॉ. शालिनी ताई कराड, डॉ.राजाराम  मुंडे आदींनी उपस्थितीत राहून पुजा व आरती केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश पारगावकर,  शिरीष राजुरकर, प्रदीप आण्णा आग्नीहोत्री, विलास माळपांडे, सुरेश राजुरकर, व पुरोहित मंडळी यांनी परिश्रम घेतले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या