इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....... आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे.

एका शिक्षकाचा 'लेटरबाॅम्ब': वैद्यनाथ मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून -पोलीस तपासात माहिती* 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

     आपला ज्याच्याशी वाद आहे त्याला पावलोपावली कसा त्रास देता येईल या भावनेतून इरेला पेटलेलली एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचे रंजक उदाहरण समोर आले आहे. वैद्यनाथ मंदिर असो की अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थान यांना थेट मंदिर उडविण्याचे धमकीचे पत्र पाठवून खळबळ उडवून देणारा आणि ही उठाठेव प्रतिवादींचा सुड घेण्याच्या भावनेतून करणारा एक शिक्षक असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

           नांदेड येथील सिडको परिसरातील एक शिक्षक असणाऱ्या व्यक्तींने उदगीर येथील त्यांची जमीन विष्णुपुरी येथील रहिवासी रतनसिंग रामसिंग दक्खने यांना विक्री केली. पण याच शेतीच्या व पैशाच्या वादातून नंतर दोघांचे खटके उडाले व वितुष्ट आले. वाद न्यायालयात पोहचला. पण या वादातून रतनसिंग यांना त्रास देण्यास या गुरुजींनी सुरुवात केली.  कोणाचाही मृत्यू झाला अथवा आत्महत्या झाली तर त्यात रातनसिंग यांचे नावे घेऊन पत्र व्यवहार करण्याचा सपाटा या गुरुजींनी लावला. ज्यात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन, इतवारा पोलीस, नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस नांदेड, मांडवी, किनवट पोलीस, परळी वैजनाथ मंदिर,अंबाजोगाई मंदिरास पत्र व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. 

        दरम्यान या प्रकरणी हा प्राथमिक तपासात पुढे आलेला संदर्भ असुन पोलीस सखोल तपास करीत आहेत.या तपासातून मुळापर्यंत ची कहाणी काही दिवसांतच पुढे येण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट