दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा

 घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण 


पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा 


परळी (प्रतिनिधी)

पंचायत समितीच्या सर्व्हेक्षण कमिटीकडून अंतिम यादीत अफरातफर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. असे करणाऱ्या पंचायत समितीच्या दोषी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून पात्र लाभार्थी कुटुंबांना घरकुल देऊन न्याय द्यावा असे तालुक्यातील मौजे करेवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

उपोषणास बसण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे करेवाडी ता.परळी वै जि.बीड येथील घरकुलचा सर्वे करून ज्या लोकांना गांवामध्ये पडकी घरे पत्र्याचे सेड,कच्चे घर असलेले नागरिक १. अशोक आबासाहेब घाटुळ २.जनक आबासाहेब घाटुळ ३. भिवराव विठ्ठल कावळे ४. भागवत विठ्ठळ कावळे ५. वैजनाथ भागवत कावळे ६. उमेश भागवत कावळे इत्यादी लोकांचे सर्वे करून घरकुल योजनेतुन आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने नांव यादीतील नाव वगळले आणि दि.१६/१०/२०२१ रोजी वार शनिवार रोजी घर पाहणीसाठी आलेल्या आपल्या कार्यालयातील अधिकारी यांनी नवरदेव फिरवल्यासारखे गावातील रस्त्याने एक फेरी मारून खोटा सर्व्हे केला व पंचायत समिती कार्यालयाने घरकुल लाभार्थी निवडी संबंधीत गावकऱ्यास खोटी माहिती देवुन आम्हा गोर-गरीबांची फसवणुक व दिशाभुल केली. तरी मा.साहेबांनी आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून संबंधीत अधिकारी यांना दि.२७/१०/२०२१ रोजी पर्यंत निलंबीत करावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता आणि दि.08 नोव्हेंबर पासून ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....