इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा

 घर नसलेल्या कुटुंबाला घरकुल देण्याच्या मागणीसाठी करेवाडी ग्रामस्थांचे आमरण उपोषण 


पात्र लाभार्थ्यांना वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा 


परळी (प्रतिनिधी)

पंचायत समितीच्या सर्व्हेक्षण कमिटीकडून अंतिम यादीत अफरातफर करण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. असे करणाऱ्या पंचायत समितीच्या दोषी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून पात्र लाभार्थी कुटुंबांना घरकुल देऊन न्याय द्यावा असे तालुक्यातील मौजे करेवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

उपोषणास बसण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे करेवाडी ता.परळी वै जि.बीड येथील घरकुलचा सर्वे करून ज्या लोकांना गांवामध्ये पडकी घरे पत्र्याचे सेड,कच्चे घर असलेले नागरिक १. अशोक आबासाहेब घाटुळ २.जनक आबासाहेब घाटुळ ३. भिवराव विठ्ठल कावळे ४. भागवत विठ्ठळ कावळे ५. वैजनाथ भागवत कावळे ६. उमेश भागवत कावळे इत्यादी लोकांचे सर्वे करून घरकुल योजनेतुन आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने नांव यादीतील नाव वगळले आणि दि.१६/१०/२०२१ रोजी वार शनिवार रोजी घर पाहणीसाठी आलेल्या आपल्या कार्यालयातील अधिकारी यांनी नवरदेव फिरवल्यासारखे गावातील रस्त्याने एक फेरी मारून खोटा सर्व्हे केला व पंचायत समिती कार्यालयाने घरकुल लाभार्थी निवडी संबंधीत गावकऱ्यास खोटी माहिती देवुन आम्हा गोर-गरीबांची फसवणुक व दिशाभुल केली. तरी मा.साहेबांनी आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून संबंधीत अधिकारी यांना दि.२७/१०/२०२१ रोजी पर्यंत निलंबीत करावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता आणि दि.08 नोव्हेंबर पासून ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या