इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

MB NEWS- *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान *

 *महिला महाविद्यालयात अर्थनियोजनाबद्दल झाले व्याख्यान *


परळी , प्रतिनिधी.

        येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्मार्ट फायनान्शिअल प्लॅनिंग बाय एस.बी.आय लाइफ' ही संकल्पना घेऊन उद्बोधक व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानामध्ये जीवनातील अर्थनियोजनाबद्दल उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.प्रमुख वक्ते डिव्हिजनल  मॅनेजर श्री नंदकिशोर कुलकर्णी यांनी सध्याच्या आर्थिक युगात अर्थ नियोजन हे कसे महत्त्वाचे आहे हे सांगून अर्थाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत समर्पक शब्दात आणि सोप्या पद्धतीने अनेक उदाहरणे देऊन फायदेशीर गुंतवणुकीचे  अनेक पर्याय सांगितले.तर डिव्हिजनल ब्रांच मॅनेजर श्री अविनाश राठोड यांनी गुंतवणुकीचे नवे पर्याय सांगताना जीवनातील विम्याचे महत्त्व विशद केले.जनरल ॲडव्हायझर श्री उमाकांत सातोनकर यांनीही बँकेच्या वतीने कार्यक्रमात महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली.

           सदरच्या माहितीपूर्ण व्याख्यानाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आर. एल. जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या