इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी

 शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन घ्या, शरद पवार यांच्याकडे विजय गव्हाणे यांची मागणी

नाशिक, प्रतिनिधी....


महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये सखोल आणि सकारात्मक चर्चा करावी अशी जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे राज्य समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज नाशिक येथे केली.



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात केली…. परभणी जिल्ह्यातील नेते तथा माजी आमदार आणि राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य समन्वयक विजय गव्हाणे म्हणाले की महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांची सोडवणूक सध्या करणे गरजेचे आहे

 राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांनी मुहूर्तमेढ लावलेल्या या शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याची नितांत गरज आहे

 राज्य सरकार शिक्षणावर केवळ अडीच टक्के खर्च करीत आहे मात्र उलट दिल्लीचे सरकार जास्त खर्च करते कोठारी कमिशन च्या आधारे हे प्रश्न सुटले पाहिजेत शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नावरही व्यवस्थित मार्ग निघाला पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली

 राज्य शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून या अधिवेशनातून शरद पवार यांना विनंती आहे की तुम्ही यात लक्ष घालावे आणि महाराष्ट्रातील आमदार यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसाचे विजय विशेष अधिवेशन घेण्याची नितांत आवश्यकता आहे

सखोल आणि धोरणात्मक निर्णय होण्याची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील शिक्षण संस्था आणि शिक्षण व इतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आज घडीस प्रलंबित आहे या प्रश्नांची तड लावण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मूलभूत क्रांती निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसांचे अधिवेशन मुंबईचा घेतले पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी या वेळेला केली


 या अधिवेशनासाठी खासदार शरद पवार मंत्री छगन भुजबळ अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नाशिक येथे हे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!