दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-बीडच्या रेल्वेसाठी राज्य शासनाचे आणखी 90.13 कोटी* *राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर* *बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे*

 *बीडच्या रेल्वेसाठी राज्य शासनाचे आणखी 90.13 कोटी*


*राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर* 



*बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध - धनंजय मुंडे*


मुंबई (दि. 23)  : ---- अहमदनगर बीड परळी या बहु प्रतीक्षित रेल्वे मार्गाकरिता 2826 कोटी एवढा

खर्च अंदाजित असून उक्त खर्चा पैकी एकूण 1413 कोटी असा 50% टक्के हिस्सा राज्य शासनाकडून रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 1021/133 अंतर्गत आणखी 90.13 कोटी रुपये बीड रेल्वे साठी मंजूर करण्यात आले आहेत.


बीड जिल्हा वासीयांचे रेल्वेचे पूर्ण स्वप्न करण्याची 50% जबाबदारी ही राज्य सरकारची असून यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज मंजूर झालेल्या 90 कोटींसह भविष्यातही ठरलेल्या समिकरणाप्रमाणे वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


बीडचे तीन पिढ्याचे स्वप्न म्हणून रेल्वे प्रश्न रखडलेला आहे. सदरील रेल्वे प्रकल्पा करिता केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 1557 कोटी इतका खर्च केला असून 2021-22 साठी 249 कोटी इतकी तरतूद केली असल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे. 


राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 1322.87 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रकल्पाच्या खर्चात हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन सन 2021-22 करिता रेल्वेने केलेल्या मागणीच्या रक्कमे पैकी 90.13 कोटी  निधी राज्य सरकारने मंजूर करून वितरित करण्यास परवानगी दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....