इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवार पर्यंत कामावर रुजू व्हावे असा इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज सोमवारी या आंदोलनाचा 38 वा दिवस असून जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामावर येणार नाही असा कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे.

          परळी वैजनाथ येथील एसटीचे कर्मचारी गेल्या 38 दिवसांपासून संपावर आहेत. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्या कर्मचाऱ्यावर अंबाजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र यालाही न जुमानता कर्मचारी संपावर ठाम आहेत.

        राज्यभरात हे आंदोलन सुरू झाल्यापासून आजपर्यंत 52 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांचा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एसटीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या