दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार

एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाबाबत ठाम निर्धार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवार पर्यंत कामावर रुजू व्हावे असा इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज सोमवारी या आंदोलनाचा 38 वा दिवस असून जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामावर येणार नाही असा कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे.

          परळी वैजनाथ येथील एसटीचे कर्मचारी गेल्या 38 दिवसांपासून संपावर आहेत. काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्या कर्मचाऱ्यावर अंबाजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र यालाही न जुमानता कर्मचारी संपावर ठाम आहेत.

        राज्यभरात हे आंदोलन सुरू झाल्यापासून आजपर्यंत 52 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांचा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एसटीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....