इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-अभिव्यक्ती स्वातंत्र्याइतकेच कर्तव्य महत्त्वाचे - पो.उपाधिक्षक जायभाये विद्यार्थ्यांनो पुस्तकाशी मैत्री करा- ॲड. हरिभाऊ गुट्टे

 अभिव्यक्ती स्वातंत्र्याइतकेच कर्तव्य महत्त्वाचे - पो.उपाधिक्षक जायभाये



 विद्यार्थ्यांनो पुस्तकाशी मैत्री करा- ॲड. हरिभाऊ गुट्टे 


परळी- जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कॉलेज मध्ये लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर रोजी संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम उपस्थित होते. सकाळच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री जायभाये- डीवाय.एस.पी, श्री एम.एस.मुंडे - पोलीस निरीक्षक हे उपस्थित होते. श्री जायभाये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध स्पर्धेमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेऊन स्वतःची उन्नती साधली पाहिजे. वादविवाद स्पर्धेत आपल्या सादरीकरणात अभिव्यक्ति स्वातंत्र्याइतकेच आपल्या कर्तव्यास महत्त्व देणे गरजेचे आहेत.

      दुपारच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख ॲड.हरिभाऊ गुट्टे - ज्येष्ठ विधिज्ञ मंचावरून मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाक्पटू होण्यासाठी स्पर्धकाने विविध गुण अंगी बाळगून स्पर्धेची तयारी करत असताना विषय ज्ञान, सामाजिक भान निर्माण करण्याची क्षमता, भाषाशैली, वाद कौशल्य, सादरीकरण, वेळेचे नियोजन इत्यादी कडे विशेष करून लक्ष दिले पाहिजे तसेच या सर्व गुणां मध्ये पारंगत होण्यासाठी केवळ आणि केवळच प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू.

      या वाद विवाद स्पर्धेत सांघिक पारितोषिक बलभीम कॉलेज बीड यांना मिळाले तर वैयक्तिक पारितोषिक प्रथम कु.साबने श्रावणी शिवाजी कै.महिला कॉलेज परळी, द्वितीय पारितोषिक विभागुन चव्हाण रोहन नामदेव बलभीम कॉलेज बीड आणि लटपटे मंदार गोविंद महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय कोद्री, तृतीय पारितोषिक कु.मोरे प्रतिक्षा बळीराम राजर्षी शाहू कॉलेज लातूर आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे

जाधव ओमहरी कल्याण बलभीम कॉलेज बीड, कु.मुंडे रागिनी गंगाराम वैद्यनाथ कॉलेज परळी, कु.रोकडे पूजा शितलदास शिवाजी कॉलेज रेनापुर. ॲड.शिवकुमार गिरवलकर, सिद्धेश्वर इंगोले, प्रा.माणिकराव देशमुख यांनी स्पर्धेच्या परिक्षणाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सुत्रसंचलन प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांनी केले तर, आभार संयोजक प्रा.डॉ.एम.जी.लांडगे यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी डॉ.प्रकाश कोपार्डे, डॉ.रामेश्वर चाटे, वाय.डी.रेड्डी, दिलीप गायकवाड ई. परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या