दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-⬛ *परळीतून निर्माण झाला क्रिकेटच्या भारतीय अ संघासाठी खेळाडू !* 🕳️ _परळीच्या अभिषेक पवारची इंडो-नेपाळ टी २० क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी निवड ; पंकजा मुंडे यांनी केले कौतुक_🕳️

 ⬛ *परळीतून निर्माण झाला क्रिकेटच्या भारतीय अ संघासाठी खेळाडू !*

🕳️ _परळीच्या अभिषेक पवारची इंडो-नेपाळ टी २० क्रिकेट चॅम्पियनशिपसाठी निवड ; पंकजा मुंडे यांनी केले कौतुक_🕳️

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     तालुक्यातील दारावती तांडा येथील रहिवासी असलेल्या अभिषेक विजय पवार याची इंडो नेपाल टी20 क्रिकेट चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे. परळी तालुक्यातून क्रिकेट साठी अ दर्जाचा खेळाडू मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी या निवडीबद्दल अभिषेक पवारचे सत्कार करुन कौतुक केले आहे.

   


 18 ते 20 जानेवारी दरम्यान नेपाळ येथे इंडो नेपाळ टी 20 चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय अ संघात परळीच्या अभिषेक पवार यांची नुकतीच निवड झाली आहे. अभिषेक हा न्यू हायस्कूल परळी चा विद्यार्थी आहे.यापूर्वी त्याने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्तरावर राज्यस्तरीय चॅम्पियनशीप मिळवली होती. त्यानंतर त्याने हा यशाचा टप्पा गाठला आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात त्याने प्रशिक्षक सतीश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्याने क्रिकेटला सुरुवात केली. भारतीय संघात निवड होणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याच्या वायोगटा प्रमाणे बीड जिल्ह्यातील तो पहिला खेळाडू ठरला आहे. परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील रहिवासी असलेला अभिषेक हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. वडील विजयकुमार पवार हे शेती करतात तर आई उषा या गृहिणी आहेत. सर्व सामान्य घरातून येऊन क्रिकेट सारख्या नावाजलेल्या क्षेत्रात आपल्या क्रीडा नैपुण्याने त्याने हे अव्वल दर्जाचे यश मिळवले आहे.

     अभिषेकचे लहानपणापासूनच क्रिकेट बद्दलचे आकर्षण पाहून व त्याच्यातील उमदा खेळाडू लक्षात घेऊन त्याला क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी प्रोत्साहन व वेळोवेळी वडील विजयकुमार पवार यांना आर्थिक सहकार्य केलेले आहे. त्याच बरोबर बालासाहेब (पप्पू) चव्हाण यांनीही त्यास क्रिकेट प्रशिक्षणासाठी वेळोवेळी प्रोत्साहित केले आहे. त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी अभिषेकचे विशेष कौतुक केले आहे. पंकजा मुंडे यांच्या हस्ते अभिषेकचा या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल बंजारा समाज व मित्र मंडळ यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....