दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

 लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी



आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन 


औरंगाबाद : देशात आणि महाराष्ट्रात ओमायक्रोनने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे शेकडो बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरणाचा वेगही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण लसीकरणाच्या या मोहिमेला राज्यात काही ठिकाणी हरताळ फासला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राचा चक्क गोरखधंदा सुरु आहे. या संतापजनक प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल िबयाणी यांनी निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अनेक निमय लागू केले आहेत. लस नाही तर रेशन नाही, पेट्रोल नाही, दारू नाही अगदी दुकानातही प्रवेश नाही, असे नियम लागू करण्यात आले. पण या नियमांना फायदा होण्याऐवजी गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. लस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र विकले जात आहे. काही पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिले जात आहे. औरंगाबादच्या रोशनगेट भागात पल्स नावाच्या  एका छोट्या क्लीनिकमध्ये हा सगळा गोरखधंदा सुरु होता. अशाच प्रकारे राज्यात सर्वत्र सर्रास बोगस प्रमाणपत्र देण्याचे कारखाने सुरू आहेत. 

लसीकरण करणे हे कोविड पासून वाचण्यासाठीचे मोठे साधन आहे. मात्र त्याचाच असा गैरवापर सुरु राहिला तर खरेच कोरोना हद्दपार होईल का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने अशा गैरप्रकार करणाऱ्या अड्‌डयांचे स्टिंग ऑपरेशन करून संबंधीतावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंजुताई दर्डा, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. पापालाल बोरा, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष डॉ.शिवकांत अणदूरे, विभागीय कोषाध्यक्ष राधेश्याम झंवर, मुंबई विभाग अध्यक्ष प्रशांत गोडसे, पुणे विभाग अध्यक्ष सोमनाथ लहाणे,  बीड जिल्हाध्यक्ष संतोषकुमार जेथलिया, लातूर जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज पाटणी, जालना जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, परभणी जिल्हाध्यक्ष मोहन धारासुरकर आिदंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....