इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन

 लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई करा : चंदुलाल बियाणी



आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन 


औरंगाबाद : देशात आणि महाराष्ट्रात ओमायक्रोनने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रोनचे शेकडो बाधित सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरणाचा वेगही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण लसीकरणाच्या या मोहिमेला राज्यात काही ठिकाणी हरताळ फासला जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्राचा चक्क गोरखधंदा सुरु आहे. या संतापजनक प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरोग्य मित्र - महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल िबयाणी यांनी निवेदनाद्वारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. 

औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अनेक निमय लागू केले आहेत. लस नाही तर रेशन नाही, पेट्रोल नाही, दारू नाही अगदी दुकानातही प्रवेश नाही, असे नियम लागू करण्यात आले. पण या नियमांना फायदा होण्याऐवजी गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. लस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र विकले जात आहे. काही पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिले जात आहे. औरंगाबादच्या रोशनगेट भागात पल्स नावाच्या  एका छोट्या क्लीनिकमध्ये हा सगळा गोरखधंदा सुरु होता. अशाच प्रकारे राज्यात सर्वत्र सर्रास बोगस प्रमाणपत्र देण्याचे कारखाने सुरू आहेत. 

लसीकरण करणे हे कोविड पासून वाचण्यासाठीचे मोठे साधन आहे. मात्र त्याचाच असा गैरवापर सुरु राहिला तर खरेच कोरोना हद्दपार होईल का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने अशा गैरप्रकार करणाऱ्या अड्‌डयांचे स्टिंग ऑपरेशन करून संबंधीतावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर आरोग्य मित्र - महाराष्ट्रचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. प्रभू गाेरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंजुताई दर्डा, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. पापालाल बोरा, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष डॉ.शिवकांत अणदूरे, विभागीय कोषाध्यक्ष राधेश्याम झंवर, मुंबई विभाग अध्यक्ष प्रशांत गोडसे, पुणे विभाग अध्यक्ष सोमनाथ लहाणे,  बीड जिल्हाध्यक्ष संतोषकुमार जेथलिया, लातूर जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज पाटणी, जालना जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, परभणी जिल्हाध्यक्ष मोहन धारासुरकर आिदंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या