इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *ओबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार—प्रा.टी.पी.मुंडे* *जिल्हाधिकारी यांना ओबीसी जन मोर्चाच्या वतीने निवेदन सादर!*

 *ओबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार—प्रा.टी.पी.मुंडे*


*जिल्हाधिकारी यांना ओबीसी जन मोर्चाच्या वतीने निवेदन सादर!*


परळी वैजनाथ /प्रतिनिधी


सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका दुसऱ्यांदा फेटाळल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आली आहे तसेच त्याला स्थगिती देण्यात आली आहे याचा फटका ओबीसी समाजाला बसला असून नाकर्त्या उदासीन सरकारच्या धोरणामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले तसेच ओबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत चालू ठेवणार व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आरक्षण मिळेपर्यंत पुढे ढकलावी अशा मागणी  ओबीसीचे जनमोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी मागणी केली.



     बीड येथे दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर तसेच उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे (सर) यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश धरणे आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध ओबीसी संघटना ओबीसी बांधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तसेच जिल्हाधिकारी यांना जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.



   आक्रोश धरणे आंदोलनाला संबोधित करताना प्रा. टी. पी. मुंडे सर यांनी राज्य सरकारवर कडाडून प्रहार केला तसेच राज्य सरकारने नऊ महिन्यांपासून एम्पिरिकल डाटा गोळा केला नाही तसेच सरकारने कोणतीही उपाययोजना केली नाही. उलट सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. राज्य सरकारने संपूर्ण ओबीसी समाजाची ओबीसीत असणाऱ्या विविध जातींची फसवणूक केली.


   ओबीसी समाजातील राजकीय नेते यांना ओबीसी आरक्षणाचे काहीही देणे घेणे नसून ते पक्षाचे बांधील आहेत मंत्रिमंडळात ओबीसी नेते असून सुद्धा ओबीसी प्रश्नावर मुग गिळून गप्प का आहे असा सवाल त्यांनी केला तसेच ओबीसी समाजातील विविध जातींनी जागृत होऊन अशा नेत्यांपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाची सुरुवात वाद्यांच्या गजरात हलगी संबळ वाद्यांच्या गजरात सुरुवात झाली ओबीसी प्रमुख नेत्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.


  

   यावेळी ओबीसी जन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रफिक भाई कुरेशी, सूर्यकांत मुंडे विनायक गडदे बाबासाहेब काळे छत्रपती कावळे माणिक सलगर जि प सदस्य प्रदीपभैया मुंडे,श्याम  गडेकर भागवत सलगर अँड संजय जगतकर, जमू सेठ, राजेश मोराळे, रेशीम नाना कावळे,अशोक मोराळे इंद्रजीत दहिफळे नवनाथ शिरसागर विश्वनाथ देवकर नागेश वावळे रवींद्र पापा गीते दौलत ढाकणे मधुकर ढाकणे राहुल कांदे शिवा चिखले भागवत बप्पा गडदे हनुमंत रुपनर सय्यद बबलू भाई शेख इलियास शेख मुस्तफा  मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे, राजाभाऊ तांदळे, भगवान गीते बाळासाहेब मुंडे, रामधन घुगे, धनंजय कावळे बंकटी ढाकणे, आदीसह ओबीसी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या