मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-*बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार* *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता*

. *बीड जिल्ह्यातील 103 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार*
 

 *पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून 103 गावांमध्ये जलजीवन मिशनमधून 87 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता* 
 *माता-माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरेल व दारात नळाला पाणी येईल, यात मोठे समाधान - धनंजय मुंडे*
 बीड (दि. 29) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 103 गावांमध्ये सुमारे 87 कोटी रुपये खर्चून जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, लवकरच या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच पाणी पुरवठा योजनेपासून वंचित राहिलेल्या 100 गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, गावांतील माता - माऊलींच्या डोक्यावरील हंडा उतरेल व प्रत्येकाच्या दारात नळाने पाणी जाईल, याचे मोठे समाधान असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील एकूण 1364 गावांचे प्रस्ताव जलजीवन मिशन अंतर्गत मागविण्यात आले असून पहिल्या टप्प्यात यांपैकी 103 गावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार यांनी दिली आहे. सर्व 11 तालुक्यातील आलेल्या प्रस्तावांची छाननी करून पहिल्या टप्प्यात 103 गावे निवडली असून, प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी नळाद्वारे देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गावागावात स्वच्छ पेयजल नळाद्वारे पोहचून टंचाईच्या काळात देखील पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था 1364 गावात निर्माण करणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, यासाठी संबंधित यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत, असे मत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....