दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान

 स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान 

परळी : एमबी न्युज वृत्तसेवा...

वंजारी सेवा संघातर्फे पूणे येथे झालेल्या  राज्यस्तरीय मेळाव्यास नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधवांनी  सहभाग नोंदवला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते  संत साहित्याचे अभ्यासक, श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक, अध्यक्ष स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


 याप्रसंगी यूपीएससी, एमपीएससीतील गुणवंत, समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. डॉ. गुट्टे महाराज वयाच्या १२ व्या वर्षापासून आध्यात्मिक, सामजिक कार्याचा वसा जोपासत आहेत. प्रवचन, कीर्तन, भागवत, रामायणवर मार्गदर्शना बरोबरच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात त्यांची अनेक विषयांवर व्याख्याने झाली आहेत. नाशिकमध्येही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ वर्षापासून संत ज्ञानेश्र्वर संजीवन समाधी सोहळा, गुरू पौर्णिमा  व गणेश जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि देशभरात श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनतर्फे अध्यात्मिक आणि समाजपयोगी उपक्रम घेण्यात येतात. त्यांची मोठी साहित्य संपदा असून, यापूर्वीही त्यांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. याच कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला. 

 मेळाव्याला त्यांनी आशीर्वादरूपी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास  राज्याचे  गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड ,धुळे महापौर प्रदीप करपे यांच्यासह इतर मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते. वंजारी सेवा संघ संस्थापक श्री.राहुलजी जाधवर,महिला आघाडी प्रदेश राज्याध्यक्ष डॉ.मंजुषा दराडे,  व सेवा संघ पदाधिकारी , समाज बांधव उपस्थित होते. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....