इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-*पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे* परळी वै.ता.१५ प्रतिनिधी २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे. विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाउन सर्व शेतकऱ्यांकडुन विम्याची माहीती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहीमेस शेतकऱ्यांमधुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातील तहसील कार्यालया समोर सोमवारी (ता.१७) मोर्चा काढण्यात येणार होते. परंतु कोरोणाचे रूग्न वाढत असल्याने शासनानी मोर्चा, आंदोलने करण्यावर निर्बंध घातले असल्याने कोरोना नियमाचे पालन करित केवळ प्रातीनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती गोळा करण्याची मोहीम मात्र सुरूच राहणार आहे. निर्बंधामध्ये शिथीलता आल्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठो, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब, कॉ. काशिनाथ सिरसाट कॉ. जगदिश फरताडे, कॉ. सुदाम शिंदे यांनी दिली आहे.

 *पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे*



परळी वै.ता.१५ प्रतिनिधी

     २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.


      विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाउन सर्व शेतकऱ्यांकडुन विम्याची माहीती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहीमेस शेतकऱ्यांमधुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातील तहसील कार्यालया समोर सोमवारी (ता.१७) मोर्चा काढण्यात येणार होते. परंतु कोरोणाचे रूग्न वाढत असल्याने शासनानी मोर्चा, आंदोलने करण्यावर निर्बंध घातले असल्याने कोरोना नियमाचे पालन करित केवळ प्रातीनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती गोळा करण्याची मोहीम मात्र सुरूच राहणार आहे. निर्बंधामध्ये शिथीलता आल्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठो, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब, कॉ. काशिनाथ सिरसाट कॉ. जगदिश फरताडे, कॉ. सुदाम शिंदे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....