इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन

बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन



   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      गेल्या काही दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन झाले आहे.बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

        यावर्षी थंडी प्रमाण निश्‍चितच लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणावरचा पाऊस, त्याचबरोबर इतरत्रचा वातावरणातील बदलसुध्दा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे थंडीची लाट कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः दोन दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही. दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम हवेत कमालीचा गारवा आहे. थंड वारे आणि या गारव्यामुळेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणातील मोठ्या प्रमाणावरच्या या बदलाने व्हायरल इन्फेक्शनसुध्दा होत आहे. गारव्याने, थंड हवेने सर्वदूर सर्दी, खोकला, अंगदुखी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येवू लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या तक्रारींमुळे नागरीक कमालीचे अस्वस्थ आहेत.       भितीपोटीच काहींनी रुग्णालयाकडे जावयास सर्रास टाळाटाळ सुरु केली आहे. तर काहींनी कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रकारच्या चाचण्यासुध्दा करावयास सुरुवात केली आहे.

       वातावरणातील हे बदल जनजीवन विस्कळीत करणारे, ठप्प करणारे ठरत आहे. सकाळी सर्वदूर धुके पसरत आहेत. त्यामुळे सकाळचे दैनंदिन व्यवहार कमालीचे मंदावले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....