परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-धुकं चढलं हरभर्याच्या झाडावर.........! वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत

  धुकं चढलं हरभर्याच्या झाडावर.........!



वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत


परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......

        गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि.१७)  शहरासह सर्वत्र थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत आली आहे.त्यामुळे शेतकरी बैचेन झाले आहेत.

         गेल्या चार पाच दिवसापासून  थंडीच्या लाटेने जनजीवन गारठले आहे. तापमानाचा पारा सरासरीने निच्चांकी येत खाली आला आहे. यासोबतच सकाळच्या दाट धुक्यात जनजीवन हरवले आहे. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या.थंडीत कुडकुडत बसावे लागत असल्याने अनेकांनी आपल्या रस्त्यालगत  शेकोट्या पेटविल्या होत्या.

         बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.सकाळी पडणारे धुके व ढगाळ वातावरण यामुळे हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत आली आहे.त्यामुळे शेतकरी बैचेन झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!