इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी

 . बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक क्षेत्रात गौरव वाढविणारे नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधीने अलंकृत करण्यात आले आहे.

      वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ श्रेष्ठ नाव म्हणून ओळख असलेले अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) हे धर्मजागृती व समाजप्रबोधन कार्यात जीवनभर कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्तरावर साधु,संत, महंत, विविध आखाडे, साधुसमाज व परंपरा यामध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात अध्यात्मिक क्षेत्रात बीड जिल्ह्याचा मान वाढवला आहे. यतीधर्म संस्करण झाल्यानंतर दंडीस्वामी म्हणून त्यांनी अमृताश्रमस्वामी हे नामाभिधान धारण केले आहे.महंत, महामंडलेश्वर, अचार्य, द्वाराचार्य आदी अध्यात्मिक उपाधींनी यापुर्वीच त्यांचा गौरव झालेला आहे. आता संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी त्यांना शंकराचार्य पिठाकडून अधिकृतरित्या "धर्मगुरू" उपाधी बहाल केली आहे.हा बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव आहे.नुकताच शंकराचार्य व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या