इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी

 . बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक क्षेत्रात गौरव वाढविणारे नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधीने अलंकृत करण्यात आले आहे.

      वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ श्रेष्ठ नाव म्हणून ओळख असलेले अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) हे धर्मजागृती व समाजप्रबोधन कार्यात जीवनभर कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्तरावर साधु,संत, महंत, विविध आखाडे, साधुसमाज व परंपरा यामध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात अध्यात्मिक क्षेत्रात बीड जिल्ह्याचा मान वाढवला आहे. यतीधर्म संस्करण झाल्यानंतर दंडीस्वामी म्हणून त्यांनी अमृताश्रमस्वामी हे नामाभिधान धारण केले आहे.महंत, महामंडलेश्वर, अचार्य, द्वाराचार्य आदी अध्यात्मिक उपाधींनी यापुर्वीच त्यांचा गौरव झालेला आहे. आता संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी त्यांना शंकराचार्य पिठाकडून अधिकृतरित्या "धर्मगुरू" उपाधी बहाल केली आहे.हा बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव आहे.नुकताच शंकराचार्य व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....