परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी

 . बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक क्षेत्रात गौरव वाढविणारे नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधीने अलंकृत करण्यात आले आहे.

      वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ श्रेष्ठ नाव म्हणून ओळख असलेले अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) हे धर्मजागृती व समाजप्रबोधन कार्यात जीवनभर कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्तरावर साधु,संत, महंत, विविध आखाडे, साधुसमाज व परंपरा यामध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात अध्यात्मिक क्षेत्रात बीड जिल्ह्याचा मान वाढवला आहे. यतीधर्म संस्करण झाल्यानंतर दंडीस्वामी म्हणून त्यांनी अमृताश्रमस्वामी हे नामाभिधान धारण केले आहे.महंत, महामंडलेश्वर, अचार्य, द्वाराचार्य आदी अध्यात्मिक उपाधींनी यापुर्वीच त्यांचा गौरव झालेला आहे. आता संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी त्यांना शंकराचार्य पिठाकडून अधिकृतरित्या "धर्मगुरू" उपाधी बहाल केली आहे.हा बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव आहे.नुकताच शंकराचार्य व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!